https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : 2022

Followers

Durga Navratri 2022

 नवरात्री  

                              हिंदू धर्मात देवी भागवत पुराणानुसार वर्षभरात मुख्यतः चार नवरात्री असतात ज्यात दोन गुप्त नवरात्री ज्या तांत्रिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात आणि दोन चैत्र नवरात्री ज्या मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात. आता चैत्र नवरात्री मध्ये एक वासंतिक नवरात्र असते जी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः मार्च ते एप्रिल मध्ये असते. आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री जी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये साजरी केली जाते. तर आता आज पासून शारदीय नवरात्र सुरू झाल्यामुळे मी आज तुम्हाला शारदीय नवरात्र बद्दल सांगतोय.

शारदीय नवरात्र:-

                        शारदीय नवरात्र ला शाक्तपंथीय मानले जाते. ही शरद ऋतूच्या सुरवातीला येत असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या काळात घट स्थापन करून नव दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते म्हणूनच या शारदीय नवरात्री ला घटस्थापना किव्वा नवरात्रोत्सव असे देखील म्हणतात. या दुर्गा देवीचे नऊ रूप सौम्य आणि उग्र अशा दोन रुपात वर्गीकरण केलेली आहे. सौम्य रुपात उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी तर उग्र रूपात काली, चंडी, भैरवी, चामुंडा अशी आहेत. 

               प्रथमंशैलपुत्रीति, द्वितीयंब्रह्मचारिणी ।

               तृतीयंचन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।।

               पंचमंस्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

               सप्तमंकालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम्।।

             नवमं सिद्धिदांप्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

             उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। 

                            अर्थात प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चतुर्थ कुष्मांडी, पंचमी स्कंदमाता, षष्टी कात्यायनी, सप्तमी कालरात्री, अष्टमी महागौरी आणि शेवटी नवमी सिद्धिदात्री अशी मुख्य दुर्गा देवीचे नऊ रूप आहेत. या नऊ रात्रीच्या नऊ दिवशी स्त्रिया वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या घालून नऊ देवींच्या रुपाची आराधना करतात जसं की 2022 च्या तारीख आणि वार नुसार पहिल्या दिवशी पांढरी, दुसऱ्या दिवशी लाल, तिसऱ्या दिवशी निळी, चौथ्या दिवशी पिवळी, पाचव्या दिवशी हिरवी, सहाव्या दिवशी ग्रे, सातच्या दिवशी भगवी, आठव्या दिवशी मोरपंखी आणि शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी गुलाबी रंगाची साडी घालून नवरात्री साजरी केली जाते ही पेशवाई पद्धत आहे. 

       पौराणिक कथा नुसार अशी मान्यता आहे की, एका महिषासुर नावाच्या दैत्याने अनेक वरदान घेऊन देवतांना छळत होता त्यामुळे सर्व देवता शिव, विष्णू आणि ब्रम्हा कडे आले आणि त्यांनी एका देवी ला प्रकट करून तिला शस्त्र-अस्त्र देऊन तिला महिषासुर चा वध करायला पाठविले. हा युद्ध नऊ दिवस चालला होता आणि शेवटी दहाव्या दिवशी महिषासुर चा त्या देवीने वध केलं. या संबधित अशी देखील मान्यता आहे की, सर्व देवतांनी नऊ दिवस त्या देवीची आराधना करून तिला शक्ती प्रदान केली. त्या नऊ दिवसांना स्मरणात ठेवण्यासाठी नऊ दिवसाची नवरात्री साजरी केली जाते. परंतू या सर्व मान्यता आहेत ज्यांचा आधार पौराणिक कथा आहेत. ज्याच्यावर काही लोकांचा विश्वास आहे तर काहींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात. मात्र हा ज्यांच्या त्यांच्या वयक्तिक विषय आहे यात माझा मुलीच विरोध नाही. ज्यांचा विश्वास आहे ते मानतात ज्यांचा विश्वास नाही ते मानत नाहीत. या नवरात्रीचा चा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे..

वैज्ञानिक दृष्टिकोन:-

                         आपले आधीचे पूर्वज ऋतू नुसार सणवार साजरे करायचे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सण मध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असायचा. नवरात्री ही साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असते ज्यात संक्रमक रोग होण्याची दाट शक्यता असते तसेच ऋतू मध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते. त्यामुळे सात्विक भोजण केलं पाहिजे. ज्याने त्याचा पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ करते. तसेच नऊ दिवस व्रत, उपासना, ध्यान केल्याने मनाची शांती सुद्धा मिळते. Times of India च्या report नुसार खाद्य पदार्थ चा प्रकृती वर होणाऱ्या परिणाम नुसार त्यांनी खाद्य पदार्थांना राजसिक भोजन, तामसिक भोजन आणि सात्विक भोजन मध्ये विभाजित केलं. राजसिक व तामसिक भोजन हा प्रकृती साठी हानिकारक ठरतो आणि सात्विक भोजन केल्याने पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ होते. म्हणुन नवरात्री मध्ये व्रत उपासना ध्यान करून सात्विक भोजन केलं पाहिजे ज्याने या काळात होणारे संक्रमिक रोग आपल्याला होणार नाही...

                            या मागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे याच काळात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्याविषयी स्त्रियांचा आदर सत्कार म्हणून देखील हा नवरात्री चा उत्सव साजरा केला जातो. चला तर मग अंधश्रद्धा विसरून हा सण साजरा करूया....

conclusion:-

                      मी या लेख द्वारे तुम्हाला नवरात्र चे धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो. कारण कित्येक लोकं याला अंधश्रद्धा समजून कानाडोळा करतात व काहीही खातात मात्र या काळात काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे हाच माझा उद्देश आहे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..


धन्यवाद....

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद

How to determine Good Writing in 2022? and Why read?

 लेखकाचा वाचक आणि वाचनाशी संबंध...

            तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? एका लेखकाचा वाचन आणि वाचक यांच्याशी थेट संबंध असतो. कारण एक लेखक हा वाचनाशिवाय कधीच लिहू शकत नाही आणि वाचकाशिवाय लेखकांच्या लिखाणाला कधीच अर्थ लागणार नाही. म्हणुन मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लेखकाने वाचन आणि वाचकांना कधीच विसरू नये. कारण वाचकांमुळे फक्त लेखकाच्या लेखनाला अर्थ च लागत नाही तर त्यांच्या प्रत्येक्ष किव्वा अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमुळे लेखकाला प्रेरणा देखील मिळत असते. आज मी अशाच एका वाचक बद्दल लिहीत आहों ज्या स्वतः सुद्धा एक उत्तम लेखिका/कवीयित्री आहेत. माझ्यापेक्षा त्या कदाचीत 1 ते 2 वर्षाने जरी लहान असतील मात्र विचारांनी माझ्यापेक्षा देखील फार मोठ्या आहेत असं मला वाटते. त्यांचं नाव “वैष्णवी संतोष खलसे” असं आहे. त्यांचा मी फार फार आभारी आहो. कारण त्यांनी माझ्या प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देऊन मला वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यासाठी एक प्रकारे प्रेरीतच केलं आहे. त्यामुळे आजचा हा लेख त्यांनीच विचारलेल्या एका प्रश्नावर आहे.

त्यांचा आवडला कॅरेक्टर मोटू
                   एके दिवशी वैष्णवी मॅडम नी मला विचारलं की सर, “आपण नेहमी म्हणतो की चांगलं लिखाण वाचलं पाहिजे, चांगलं लिखाण वाचलं पाहिजे तर मग चांगलं लिखाण आपण कसं निवडायचं? आणि वाचन का करावं? किव्वा कशासाठी करावं?” मी फार मोठा लेखक नाही परंतु मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते, लिखाण हे लिखाण असते मात्र त्यातून आपण चांगलं काय घेतो आणि वाईट काय घेतो यावर अवलंबून असते.  आता उदाहरणार्थ बघितलं तर, आपल्याकडे असे कित्येक पुस्तके किव्वा लेख आढळतील ज्यात भाकड (विश्वास न करता येणारे) कथा आहेत ज्यांच्या आधारे समाजाची दिशाभूल केली जाते. परंतु आपण ते कुणाच्यातरी सांगण्यावरून वाईट आहे म्हणून वाचणारच नाही तर आपल्याला त्यावर विचार करता येईल का? आणि जर आपण त्यावर विचार च केला नाही तर ते लिखाण किव्वा पुस्तक कुठं वाईट आहे हे कळेल का? आणि आपल्याला त्यात काय वाईट आहे हेच कळणार नाही तर आपल्याला चांगलं काय आहे हे देखील कळणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते तर त्यातल्या काही बाबी चांगल्या किव्वा वाईट असतात. ते आपल्याला फक्त वाचून नाही तर चांगला विचार करून ठरवायच्या असतात की त्यात काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, आपण वाचन का करावे? किव्वा कशासाठी वाचन करावे? तर याचं एकच उत्तर आहे. वाचनाने माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि एकदा विचार करण्याची क्षमता वाढली की त्या व्यक्तीला चांगलं लिखाण कोणतं? आणि वाईट लिखाण कोणतं हे निवडण्याची गरज भासणार नाही. तर वाईट मधून सुद्धा चांगलं आत्मसात करायची कला अवगत होते.  

              मी वर सांगितल्या प्रमाणे फार मोठा लेखक नाही परंतू मी माझ्या परीने उत्तर देण्याचं प्रयत्न केलो. एक लेखक म्हणून माझ्या वाचकांप्रती ही माझी जबाबदारी आहे की, मी माझ्या वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तसेच मी माझ्या सर्व वाचकांना हे सांगतोय की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटते किव्वा मला जे काही विचारावं वाटते ते नक्की विचारा. मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. परत एकदा मी “वैष्णवी संतोष खलसे” तसेच इतर वाचकांचा फार फार आभारी आहो कारण तुम्हीच मला एवढं मोठं केलं आहे.

धन्यवाद... 

तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद(रावण)

7820994148

Who is the Ambedkarwadi? खरा आंबेडकरवादी कोण?

 आंबेडकर साऱ्यांचा बाप आहे.....

Do. Babasaheb Ambedkar 
                                      प्रस्तुत लेख लिहिण्यापूर्वी मी प्रथमतः परम् पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. कारण त्यांच्यामुळेच आज माझ्या हातात लेखणी आहे आणि तसेच लिहिण्याचं, एखाद्या विषयावर आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देखील मिळालं आहे. माझे एक मित्र विद्रोही कवी/लेखक रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक फार चांगली कविता लिहिली. ती कविता मला पटली नाही अशातला भाग मुळीच नाही तर ती कविता मला फार आवडली. परंतू ते म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात अगदी त्याच प्रमाणे प्रत्येकच गोष्टीच्या दोन बाजू असतात. कवितेची तीच दुसरी बाजू स्पष्ट करण्यासाठी मी प्रस्तुत लेखक लिहीत आहो. 

                      ती म्हणाली,

                      आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे

                      आणि मी इथच तिच्या प्रेमात पडलो.......

                                         अगदी खरं आहे मिर्झा, आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे यात काडी मात्र शंका नाही. मात्र आपण 'आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे.' असं ऐकून ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो ती व्यक्ती खरचं आंबेडकरवादी आहे का? की ती व्यक्ती देखील आपलं काम काढून घेण्यासाठी आम्हाला भावनिक करण्याच्या प्रयत्न करत आहे. यात मात्र मला नक्कीच शंका आहे. कारण एक दिवस कुणीतरी येऊन भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपल्याकडून च नारेबाजी करून मत मागतो. आणि आपण सुद्धा याने बाबासाहेबांचं नाव घेतला म्हणजे तो आंबेडकरवादी च असेल असं समजून भावनेच्या भरात त्याला निवडून देतो. आमच्या भरोशावर तो निवडून येतो आणि घरी बसून खातो परंतु आपण मात्र फक्त नारेबाजी करत राहतो. कारण त्याने डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतलं असतं म्हणून आपण त्याला डोक्यावर चढवलो परंतू तो आंबेडकरवादी आहे किव्वा नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. Tik Tok वर एक मुलगा एक व्हिडिओ बनवतो त्यात तो पांढरे कपडे घालून एका पांढरी साडी घालणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला विहारात जातो आणि background मध्ये एक गाणं असतो, पांढरे कपडे घालून बुद्ध पूजेला बसावं आपण त्यालाही Viral करतो. मात्र त्याने त्याच्या डाव्या पायात घातलेला काळा धागा मात्र कुणालाही दिसत नाही जो धनलाभ होण्यासाठी तो घातलेला असतो कारण आम्ही बाबासाहेब किव्वा बुद्धांचं नाव घेतलं की आपण त्याला डोक्यावर घेतो मात्र बुद्ध धर्मात मूर्ती पूजा किव्वा अंधश्रध्देला स्थान नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. असच एकदा कुणालातरी म्हटलं होतं की, मूर्ती पूजा करू नये तर तो म्हणाला की, मग आम्ही मुर्त्या फोडायच्या का? कित्ती लाजिरवाणी गोष्ट आहे, आम्हाला मुर्त्या, पुतळे, स्मारके का तयार केलेली आहेत ते देखील माहिती नाही. मुर्त्या, पुतळे किव्वा स्मारके हे पुढच्या पिढीला खरा इतिहास सांगण्यासाठी कामात येणार आहेत. अन्यथा समोरच्या पिढीला काल्पनिक कथा सांगून खरा इतिहास गहाड केला जाईल. मी मूर्ती पूजा करू नका म्हटलो मात्र याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मुर्त्या पुतळे किव्वा स्मारके फोडा. परंतु आपण या सर्व गोष्टीचा कधीच विचार करू शकत नाहीत कारण आपण आपली विचार करण्याची क्षमता च गमावून बसलो आहोत. म्हणुन आपल्याजवळ कुणीही येऊन डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतो आणि आपल्याला भावनिक करून आपलं स्वार्थाचं काम करून निघून जातो. ही परिस्थिती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीच संबंधित नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीही संबंधित आहे. १९ फेब्रुवारी आली की कॉलेज च्या कट्टयावर बसून मुलींची थट्टा करणारे कित्येक तरुण मुलं शिवरायांसारखी दाढी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून बाहेर पडतात. हातात भगवे झेंडे धरून गावभर फिरतात मात्र शिवरायांच्या एकाही विचारांवर ती मुलं चालतांनी दिसत नाहीत. फक्त १९ फेब्रुवारी आली की यांच्या अंगात शिवराय संचारतात. अशाच शिवभक्तांचा राजकारणी सर्रास वापर करून घेतात.

Chhatrapati Shivaji Maharaj 
                                आपल्या जवळ कुणीही येऊन शिवरायांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपण त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. मात्र ते खरचं त्यांच्या विचारांवर चालतात किव्वा नाही याचा विचार मात्र करीत नाही. यांच्या जयंत्या आल्या की DJ लावून नाचण्यात एवढे गुंग झालो की आपला वाचनाकडे दुर्लक्ष झाला आणि हेच कारण आहे की आपण विचार करण्याची क्षमता गमावून बसलो. आज बघायला गेलं तर एका छोट्याशा गावात देखील १० ते २० हजार किंबहुना त्यापेक्षाही अधिक रुपये आपण दरवर्षी या जयंत्या मध्ये DJ वर नाचण्यात खर्च करतो. परंतु आज किती गावात किती ग्रंथालयं आहेत आणि त्या ग्रंथालयांमध्ये शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे किती पुस्तके आहेत याकडे लक्ष घालत नाही. त्यांच्या जयंत्यामध्ये एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जे तेच पैसे त्या ग्रंथालयासाठी खर्च केले तर ०४ ते ०५ वर्षात चांगलं ग्रंथालय प्रत्येक गावात स्थापन होतील आणि प्रत्येक लोकांना शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे विचार वाचायला मिळतील. आणि मला नाही वाटत या थोर पुरुषांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी यापेक्षा चांगला कुठला मार्ग असेल!

Conclusion:-

                      मला एवढंच म्हणायचं आहे की, कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बाबासाहेबांचं नाव घेणारं किव्वा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारं खरचं त्यांच्या विचाराचं आहेत का? याचा विचार करून नंतरच विश्वास ठेवा. तसेच जयंती आली की DJ लावून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा हीच खरी जयंती आहे.

                 प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी मला तुझ्या कवितेवर आपले विचार व्यक्त करायला मला परवानगी दिल्याबद्दल रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा भाई तुझे खूप खूप आभार! माझ्याकडुन नकळत पणे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कर तसेच माझ्यामुळे नकळत पणे कुठल्याही समाजातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो. माझा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा न्हवता. काही चुकलं असेल किव्वा काही सुटलं असेल तर कमेंट द्वारे मला नक्कीच मार्गदर्शन करा मी तुमच्यापेक्षा फार काही मोठा नाही मी एक विद्यार्थी च आहों. मला जे काही वाटलं ते मी तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो.


धन्यवाद....

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद

मु.पोस्ट:- उमरी/लवारी 

ता. साकोली, जिल्हा:- भंडारा

Character less रांड

 रांड 

           आज मी एका अशा विषयावर लिहीत आहों जे वाचून कदाचित काही मुलांना माझा राग येईल. काही मुलं मला शिव्या पण देतील. पण मी लिहिणार कारण ते सत्य आहे. मी मुलगा झालो म्हणून काय झालं जे चुकीचं आहे त्याला माझा कायम विरोध राहील मग समोर कुणीही असो. एखादी मुलगी आपल्यासोबत relation मध्ये असेल आपल्यासोबत physical झाली असेल आणि नंतर ब्रेकअप झालं असेल. तीच मुलगी जर कधी दुसऱ्या कुठल्या bf ला date करतांनी दिसली की आपण तिला सर्रास रांड म्हणतो. ठिक आहे जर ती तुमच्या दृष्टीने रांड असेल तर ठीक आहे ना पण ती तुमची gf असायच्या आधी तुमच्या 3-4 gf होत्या त्यांचं काय? किव्वा तिच्या सोबत relation सुरू असतांना सुद्धा तू दुसऱ्या मुली सोबत physical झाला त्याचं काय? किव्वा ती सोडून गेल्यानंतर तू सुद्धा दुसरी मुलगी बघितलासच त्याचं काय? तिने दुसरा bf बनवला म्हणून जर ती रांड झाली तर तुझ्या तर कित्येक gf झाल्यात मग तुला काय म्हणायचं? 

            मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगतो तिचं नाव मी सांगत नाही पण ती माझी सिनियर होती. तिला सर्वच मुलं रांड म्हणत होते. म्हणून मी सहज एका मुलाला विचारलो की, या मुलीला रांड का म्हणतात? तर त्याने मला सांगितलं की, ही या मुलीचे खूप bf झालेत आणि ही मुलगी नेहमी BF बदलत असते. त्या मुलीच्या गावचे माझे खूप मित्र मैत्रीण होते त्यांच्या साहाय्याने मी तिची माहिती जाणून घेतलो आणि हे सर्व ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला....! कारण एवढी साधी सरळ मुलगी आज प्रत्येक मुलाच्या नजरेत रांड कशी ठरली? असा मला प्रश्न पडू लागला. मी हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी as a ज्युनियर स्टूडेंट म्हणून contact वाढवलो आणि तिच्याशी एकदिवस मैत्री केलो. तेव्हा तिच्याकडून च मला तिचा पहिला bf कोण होता हे कळलं आणि योगानुयोग च जणू तिचा पहिला bf माझ्या च जवळचा व्यक्ती होता. मी तिला नंतर याबद्दल म्हटलो की, हे तू चुकीचं करत आहे हे लवकरात लवकर थांबव. आणि तिच्या त्या पहिल्या bf ला पण त्यांच्या relation बद्दल विचारलो तेव्हा मला कळलं की तिचं प्रॉब्लेम काय आहे. 

           तिच्या पहिल्या bf ने तिच्याशी फक्त Physical होण्यासाठी प्रपोज केलं आणि ते नंतर थोड्याच दिवसाने Physical सुद्धा झाले एकदा नाही तर अनेकदा physical झाले. आणि हेच नेहमी नेहमी physical झाल्यामुळे तिला सवय झाली पण काही दिवसांनी हे प्रकरण त्या मुलीच्या घरी कळलं आणि त्याचं relation break झालं. नंतर तिला दुसरा bf मिळाला त्यानेही फक्त Physical होण्यासाठी relation ठेवलं आणि काही दिवसाने ब्रेकअप केलं असेच तिला bf भेटत गेले त्यामुळे तिला जणू ही सवय च झाली. bf बनवायचं त्याच्याशी physical व्हायचं आणि 1-2 महिन्याने ब्रेकअप करायचं. आता मला सांगा ती तर एक साधी सरळ मुलगी होती मग ति रांड कशामुळे झाली? जर ती 10 bf बदलवत असेल आणि मुलांशी physical होत असेल तर मुलांच्याही कित्येक gf असतातच आणि तेही ही कित्येक मुलींशी physical होतात त्यामुळें तिला रांड म्हणायचा तुमचा अधिकार नाही. मी असं म्हणत नाही की प्रेमात Physical होऊ नका. पण Physically Attract होऊन physical होऊ नका.

                 एखादी व्यक्ती आपल्या पार्टनर सोबत Physically Attraction द्वारे जर phycical होत असेल तर त्यांच्या मधलं प्रेम कमी होत जाते. सरळ भाषेत सांगायचं झालं तर नेहमी नेहमी एकाच पार्टनर सोबत Physical होऊन ते बोअर होतात. हे मी नाही म्हणत तर it's a psychological fact. त्यामुळे हल्ली तरुण किव्वा तरुणींचं bf/gf बदलणं हे स्वाभाविक आहे. मला मान्य आहे हे चुकीचं आहे पण याचं कारण ही आपला समाज आहे जो कधी sex बद्दल मनमोकळे पणाने बोललं जात नाही. आणि आपण मुले सुद्धा कधी मोठ्यांना विचारत नाहीत. आपण आपल्या मित्र वा मैत्रिणींना विचारतो त्यांना असलेलं अर्धवट ज्ञान ते तुम्हाला सांगतात. आणि अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते. आणि आपण अशा चुका करून बसतो ज्या खरच चुका आहेत तुमचा मनोरंजन हे ही तुम्हाला कळत नाही तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून करता. मी पुन्हा सांगतो physical होणं चुकीचं नाही फक्त तुमची पद्धत चुकीची आहे त्याबद्दल जाणून घ्या sex बद्दल पूर्ण जाणून घ्या. शक्यतो मोठ्यांना विचारा. पण अर्धवट ज्ञान असणाऱ्या किव्वा अशा मित्रांना किव्वा मैत्रिणींना विचारू नका जे फक्त मनोरंजन म्हणून sex करतात. Sex education is most important in our life.

            माझं पुन्हा एकदा मुलांना सांगणं आहे की अशा मुलींना कृपया रांड म्हणून त्यांची बदनामी करू नका तुमच्याही घरी आई आहे बहीण आहे याचा भान असूद्या. तुमच्या बहिणीला सुद्धा मी रांड म्हटलो किव्वा एक रात्र झोपायला माझ्या घरी पाठवा म्हटलो तर मग तुम्हाला ही राग यायला नको पाहिजे याचाही विचार करून ठेवा. ती जर रांड असेल तर तिला रांड बनवणारे तुम्हीही काही तिच्यापेक्षा कमी नाही. माझ्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी मुळीच माफी मागणार नाही कारण मी यात चुकीचं काहीही लिहिलो नाही. जर काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा मी ही काही मोठा नाही. तुमच्याच वयातील मुलगा आहों.

 

धन्यवाद.....!

 

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद(रावण)

Unemployment बेरोजगारी

बेरोजगारी 

                                    मी आज Google वर what is the common problem of people's in India असं Search केलो तर उत्तर मध्ये Unemployment आलं. CMIE म्हणजेच Centre for Monitery Indian Economy च्या आकड्या नुसार May 2022 मध्ये Unemployment Rate 7.12% होता तर तोच June 2022 मध्ये वाढून 7.80% झालेला होता. बेरोजगारीच्या या वाढत्या आकड्यांना बघता खरचं भारतातील लोकांचा बेरोजगारी ही सामान्य समस्या झालेली दिसतेय. बेरोजगारी हा जेवढा भारतातील लोकांचा Common Problem आहे तेवढाच या Problem चा Common Solution देखील आहे. परंतु हा Solution तुम्हाला सांगायच्या आधी तुम्हाला Unemployment ची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जो पर्यंत बेरोजगारी ची कारणे समजून घेणार नाही तो पर्यंत तुम्हाला बेरोजगारी चे उपाय देखील समजणार नाही. 

What is the reason of unemployment? बेरोजगारीचे कारण:

         आपल्या समाजात एक खूप प्रचलित म्हण आहे, 'Your degree is just a piece of paper and your education is seen in your behaviour.' अर्थात तुमची पदवी फक्त एक कागदाचा तुकडा आहे आणि तुमचे शिक्षण हे तुमच्या योग्य आचरणामधून दिसते. परंतु योग्य आचरण ठेवण्यासाठी योग्य शिक्षण घ्यावं लागते आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला त्या शिक्षणाचा पुरावा म्हणून एक पदवी प्राप्त होते. यावरून हे सिद्ध होते की, पदवी हा अप्रत्यक्षपणे तुमच्या आचरणाचा पुरावा आहे. मग ती पदवी मात्र कुठल्याही शिक्षण संस्थेची असू शकते किव्वा कुठल्याही सामाजिक संस्थेची असू शकते. याच पदवी च्या आधारावर तुम्हाला काम दिला जातो. आणि काम करण्यासाठी ते काम करण्याची आपल्याला आवड आणि ते काम करण्याचं कौशल्य आपल्याला मध्ये असायला हवं. परंतु हल्ली तरुण पदवी शिक्षण निवडतांना त्यांची आवड आणि क्षमता काय हे न बघता Scop कुठं आहे ते बघतात. मग कसं तरी पदवी प्राप्त करून ते काम शोधायला जातात परंतु ते काम करायची त्यांच्यामध्ये आवड आणि कौशल्य नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाही आणि मिळालं च तर फार काळ टिकत नाही. बेरोजगारी वाढण्याचं हेच मुख्य कारण आहे. 

                     मी आत्ता मागच्या आठवड्या मध्ये Living certificate साठी apply करायला College मध्ये गेलो होतो तर तिथे मला एक B.SC 1st year चा Student भेटला. तो मला म्हणाला, “दादा, मी माझं Admission CBZ(Chemistry-Boilogy-Zoology) या group मध्ये केलो परंतु मला आता CS(Computer science) या group मधून करायचं आहे.” मी त्याला Admission Transfer करायचं कारण विचारलो तर तो मला म्हणाला की, “Computer Science मध्ये खूप Scop आहे.” आता आश्चर्याची गोष्ट अशी की, त्याला Computer चं कसलंच Knowledge न्हवतं. शिवाय आवड देखील न्हवतीच फक्त त्याला कुणीतरी सांगितलं की computer science मध्ये खूप Scop आहे म्हणून तो करत होता. ०३ वर्षात तो देखील कसंतरी पदवी प्राप्त करेल आणि मग job शोधायला जाईल पण कसंतरी पदवी मिळविल्यामुळे वरून त्या विषयात आवड आणि कौशल्य नसल्यामुळे त्याला बरोबर जॉब मिळणार नाही. वरून फक्त आणि फक्त Scop असल्यामुळे जास्तीत जास्त Student त्याच विषयाकडे वळतात त्यामुळे Student ची संख्या जास्त आणि jobs कमी असल्यामुळे देखील काही पदवी प्राप्त Student बेरोजगार राहतात. 

           आता Job मिळत नाहीत म्हणून कित्येक मुलांचा कल हा Business कडे वळत चाललेला आहे. हे सुद्धा फार उत्तम आहे परंतु फक्त जॉब मिळत नाही म्हणून तुम्ही business कडे वळत असणार तर हे देखील फार धोक्याचे ठरेल. कारण Business करणे हे काही लहान मुलांचं खेळ नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागते शिवाय पेशन्स सुद्धा महत्वाचा असते. त्यामुळे यातही तुम्हाला तुमची आवड बघावी लागेल शिवाय यात तुम्ही योग्य रीतीने स्वतःचा best देऊ शकता का हे बघावं लागेल. Job ला पर्याय म्हणून Business समझू नका हा देखील एक करियर चा मार्ग आहे ज्यात आवड आणि कौशल्य असेल तर यातही नक्कीच यश मिळेल. 

                                 करियर निवडतांनी स्कोप कुठं आहे हे न बघता आपली आवड आणि कौशल्य काय आहेत हे बघा आणि करियर निवडा म्हणजे तुम्ही बेरोजगार राहणार नाही. तुम्ही निवडलेल्या विषयात पदवी प्राप्त करून देखील दुर्दैवाने Job मिळाली नाहीत तरी देखील घाबरून जायचं काम नाही कारण तुमची त्या विषयात आवड आणि कौशल्य असल्यामुळे तुम्ही स्वतःचं काहीतरी करून नक्कीच आयुष्य घडवता येईल मी या आधी सुद्धा (करियर कसं निवडायचं) या blog post मधून सांगितलोय की चुकीचं करियर निवडल्या नंतर काय परिणाम होतात आणि करियर कसा निवडावा हे देखील या blog मध्ये लिहिलोय एकदा त्या लिंक वर जाऊन नक्कीच वाचा.

Conclusion:

                      करियर निवडतांनी च जर आपण आपली आवड, कौशल्य बघून करीयर निवडलं तर नक्कीच Unemployment Rate हा कमी होण्यास मदत होईल शिवाय तुम्हाला देखील तुमच्या आवडीचं काम करता येईल. 

                  हा Article कसा वाटला याबद्दल Comment द्वारे नक्कीच कळवा आणि आवडल्यास Share करा....

धन्यवाद....


तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद






Menstrual cycle: मासिक पाळीचं सत्य

#पाळीविषयीबोलूया



मासिक पाळी


                                 आपण धर्म आणि संस्कृती मध्ये एवढे बंदिस्त झालोत की, याच्या पलीकडे जाऊन बरोबर काय आहे? आणि चुकीचं काय आहे? याचा आपण विचारच करू शकत नाही. दोन शब्दात सांगायचं झालं तर आपण सर्व वैचारिक गुलाम झालोत. परंतु याच वृत्तीमुळे आपल्या आई बहिणींना किती त्रास होत असेल याचा आपण कधी विचारच केला नाही. होय....! आजपर्यंत जो आपण समाजात मासिक पाळी बद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवीत आलो तसेच मासिक पाळी बद्दल समाजात उघडपणे बोलणाऱ्या आणि लोकांचे डोळे उघडू पाहणाऱ्यांना गप्प करत आलो. त्याच मासिक पाळी मुळे आपल्याच आई, बहीण, बायको, मैत्रिण यांना फक्त शारीरिक त्रास च नाही तर मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. यात दोषी फक्त एक पुरुष च नाही तर ती स्त्री सुद्धा आहे जी वर्षानुवर्षे फक्त आणि फक्त धर्म आणि संस्कृती च्या जाळ्यात अडकून वैचारिक गुलाम झालेली आहे आणि सोबतच आपल्या पुढच्या पिढीला देखील धर्म आणि संस्कृती च्या जाळ्यात अडकवून वैचारिक गुलाम बनवू पाहत आहे. या समाजाने जसं इतरही बोलणाऱ्यांना गप्प केलं होतं तसं मला ही गप्प केलं होतं आणि मी त्यावेळी गप्प देखील झालो होतो कारण कदाचित त्यावेळी माझी वय आणि हाथही लहान पडत होते. परंतु आज माझी वय सुद्धा लहान नाही आणि माझे हाथ ही लहान नाहीत म्हणून मी आज या विषयावर लिहायचं ठरवलं आहे. ही Blog Post वाचून कदाचित 100 मधून 99 लोकं मला शिव्या देतील पण ती 1 व्यक्ती वाचून स्वतःमध्ये परिवर्तन नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि मी सुद्धा त्याच एका व्यक्ती साठी लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. 

मासिक पाळी

                  मी साधारणतः इयत्ता सातवी मध्ये असतांना मला एक प्रश्न पडला होता. हे मासिक पाळी नेमकं काय असते? आणि याचा विंटाळ का बरं मानला जात असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी माझ्या इतिहासाच्या मॅडम ला हा प्रश्न विचारलो होतो. त्यावेळी मला त्यांनी मला रागवत गप्पं केलं होतं. मी तो प्रश्न विचारत असतांना माझा एक मित्र माझ्या शेजारी च उभा होता त्यामुळे त्याने मला या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मला ते उत्तर ऐकून मला सुद्धा पाळी विषय फार किळसवाणं वाटलं. आणि मासिक पाळी ला विंटाळ मानायचं कारण देखील हेच असेल असं मला वाटायला लागलं होतं... मला त्या मॅडम नी गप्पं न करता जर माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं असतं तर कदाचित मी हा प्रश्न माझ्या मित्राला विचारलो नसतो. आणि त्याला असलेल्या अर्धवट ज्ञान मुळे दिलेलं उत्तर ऐकून मी माझ्या मनात पाळी विषयी चुकीची धारणा मनात धरून बसलो नसतो. जसं त्यावेळी माझ्या मनात मासिक पाळी विषयी चुकीची धारणा होती माझ्या मित्राच्या अर्धवट ज्ञान मुळे अगदी तसच या समाजात देखील मासिक पाळी विषयी चुकीचा धारणा आहे. कारण या विषयी कधीच उघडपणाने बोललं जात नाही आणि माझ्यासारख्या एखाद्या मुलाला हा प्रश्न पडला तर त्याला गप्पं केलं जाते. या समाजात मासिक पाळी विषयी गैरसमज होण्या मागचं आणखी एक कारण जे इयत्ता सातवी मध्ये असतांना अनुभवलोय ते म्हणजे, आपल्या अशा प्रश्नाचं उत्तर देण्यास जेव्हा मोठी माणसे नकार देतात तेव्हा आपण दुसऱ्या मोठ्या माणसांना न विचारता एखाद्या मित्रांना विचारतो ज्यांना त्याबद्दल अर्धवट ज्ञान असते आणि अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते. याच अर्धवट ज्ञानामुळे समजात चुकीच्या धारणांना वेग वाढतो. 
                मी माझ्या मित्राच्या अर्धवट ज्ञान मुळे मासिक पाळी विषयी चुकीची धारणा मनात धरून बसलो होतो मात्र काही वर्षांनी जेव्हा मला कळलं की आपला सर्वांचा जन्म हा त्याच मासिक पाळीच्या प्रक्रियेमुळे होतो तेव्हा मला मासिक पाळी बद्दल आणखी नव्याने माहिती घेण्याची मनात इच्छा निर्माण झाली म्हणून मी परत मोठ्या मोठ्या शिक्षित लोकांना याबद्दल विचारू लागलो. आणि त्या सर्वांचं वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण काही वर्षापूर्वी माझ्या मित्राने सांगितलेल्या उत्तराच्या पूर्णतः हे विरुद्ध होतं. ही मासिक पाळी किळसवाणी नाही आणि याबद्दल विंटाळ मानावा अशीही नाही तर, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून एका नवीन बाळाचा जन्म होतो. मग मला आणखी एक प्रश्न पडला की, जर ही मासिक पाळी एक नैसर्गिक क्रिया आहे आणि यातून एका नवीन बाळाचा जन्म होतो तर मग या क्रियेसाठी विंटाळ का पाळला जात असेल? याचं खरं उत्तर जाणून घेण्यासाठी मी काही अभ्यासकांना विचारलो तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आधी मासिक पाळी काय असते हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि मासिक पाळी काय असते? हे जाणून घेण्यासाठी गर्भधारणा किव्वा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाळाचा जन्म कसा होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.
                     स्त्री च्या अंडाशय मधून निघणारा स्त्रीबीज अर्थात एक अंडज हा समागम(sex) दरम्यान पुरुषीय स्त्रीबीज अर्थात वीर्य द्वारे फलित (fertilization) होतो. याच प्रक्रियेमुळे गर्भ तयार होतो आणि एका बाळाचा जन्म होतो. परंतु जेव्हा हा स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळी हा रक्ताच्या स्वरूपात योनीमार्गातून बाहेर टाकला जातो ज्याने साधारणपणे 5 दिवस स्त्री/मुलीच्या योनी मार्गातून रक्तस्त्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. तिच्या योनीमार्गातून याच 14.78 ते 73.93 मिली लिटर blood जाते. ही मासिक पाळी मुलीच्या वयाच्या साधारणपणे 12 ते 13 वर्षापासून सुरू होते तर वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत बंद होते. या दरम्यान त्या मुलीला अथवा स्त्रिला असह्य अशा वेदना होतात त्यामुळे तिला 4 ते 5 दिवस सक्त आरामाची गरज असते. कदाचित हेच कारण होतं की आधीची लोकं त्या स्त्री ला किव्वा त्या मुलीला घरातील कामे करु देत नसून तिला सतत आराम करायला लावत होते. आणि कालांतराने ज्ञानाच्या अभावामुळे काही लोकांनी मासिक पाळी आलेली स्त्री किव्वा मुलगी अशुद्ध होते हे जगजाहीर केलं. आणि त्यामुळेच या समाजात मासिक पाळी मध्ये विंटाळ पाळला जातो.

मासिक पाळी आणि समाज 

                                     हा समाज मासिक पाळी बद्दल विंटाळ पाळण्यामध्ये एवढं बंदिस्त झालाय की या पलीकडे जाऊन त्याला त्या स्त्रीला किव्वा त्या मुलीला किती मानसिक त्रास होत असेल याचा विचार देखील करण्याच्या मनस्थिती मध्ये राहिलेला नाही. एवढंच नाही तर आज स्वतः काही स्त्रिया देखील या मानसिक गुलामीचे शिकार झाले आहेत. तिला मासिक पाळीच्या काळात वेगळं च बसवतात वेगळं च झोपवतात. इतकंच नव्हे तर जेवायला सुद्धा वेगळं च देतात. आणि तिने जेवलेल्या प्लेट ला सुद्धा धुवून त्यावर पाणी शिंपडून आत ठेवलं जाते. ती ज्या ग्लास मध्ये पाणी पिते त्या ग्लास ला देखील कुणी शिवत नाहीत. आणि चुकीने तिला कुणी शिवलं तर त्या व्यक्तीला परत अंघोळ करायला लावतात. मासिक पाळी चालू असतांनी तिला कुठल्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ देत नाही. कारण नसतांना सुद्धा तिला या सर्व गोष्टी निमूटपणे सहन कराव्या लागतात. पण लोकांना हे कळत नाही की मासिक पाळीचा आणि अशुद्धतेचा काहीही संबंध नाही. कोणे एकेकाळी हेच रक्त दैवी देणे समजले जायचे. स्त्रीची पुनर्निमितीची क्षमता या मासिक पाळीतील रक्तातून व्यक्त होत असते असे मानले जायचे आणि म्हणून रज:स्वला स्त्रीकडून पाळी चालू असतांना शेताची नांगरणी केली जायची. एवढेच नाही तर सहाव्या शतकात वराहमिहिर नावाच्या ऋषींनी देखील सांगितलं होतं की, “स्त्रीबीज फळले नाही तर ते मृत होते आणि गर्भाशयाच्या अस्तराबरोबर रक्ताच्या प्रवाहातून बाहेर टाकले जाते. एक प्रकारे स्त्री शुध्द होते आणि पुनर्निमितीसाठी पुन्हा एकदा तयार होते.” या आधारे बघितलं तर स्त्री/मुलगी ही मासिक पाळी दरम्यान अशुद्ध नाही तर शुद्ध असते. परंतु हा समाज अंधरूढी-परंपरा मध्ये एवढा आंधळा झालाय की त्याला आपलीच बहीण, आई, बायको, मैत्रीण मासिक पाळीच्या अंधरूढी-परंपरा मुळे कित्ती मानसिक त्रास सहन करते हे दिसत नाही आहे. Condoms तर रात्री 12 वाजे सुद्धा medical मधून हे घेऊन येतात परंतु आपल्या घरच्या आई, बहीण, बायको साठी sanitary pads आणायला मात्र यांना लाज वाटते. अरे ही लाज वाटायची गोष्ट नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. माझं या समाजाला एकच सांगणं आहे की तुम्हाला तुमच्या आई बहीण बायको यांचं आयुष्य आरोग्यदायी बनवायचं आहे तर यावर उघडपणे बोलून त्यांना सहयोग करा. आणि मासिक पाळीची लाज नको तर अभिमान बाळगा.

Conclusion:-

                     शेवटी मी एवढंच सांगेन की, जर मासिक पाळी ही प्रक्रिया अशुध्द असेल तर तिच्यापासून जन्मलेली ही संपुर्ण दुनिया च अशुध्द आहे. आता ही मासिक पाळी शुद्ध आहे की, ही संपूर्ण दुनिया अशुध्द आहे याचा निर्णय मी या समाजावर च सोडतो.                   

            या Blog Post मध्ये काही चुकलं असेल किव्वा काही सुटलं असेल तर Comment द्वारे नक्की कळवा. कारण एवढ्या गंभीर विषयावर मी परिपूर्ण लिहू शकेन एवढा मोठ्ठा तर मी मुळीच नाही तरी देखील मी परिपूर्ण लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न केलो. ही Blog Post मी जरी लिहिलो असेन तरीपण या blog post चं सर्व श्रेय माझं नाही आहे तर या बाकीच्यांचं आहे:
हनुमंत थोरात(MLT, BSC)
मयुरी खानविलकर(MSW)
गायत्री पाटील (poly 2nd year)
वैष्णवी खलसे (BA 1st year)
वैष्णवी राऊत (Bsc 1st year)
काही लोकांचा समज होता की या विषयावर मुली बोलणार नाहीत परंतु जेव्हा मी हा विषय घेतलो तेव्हा या सर्व मुलींनी तसेच हनुमंत थोरात सरांनी स्वतः मला msg करून लिहिण्यास माझी पुरेपूर मदत केली. त्यामुळे य ब्लॉग चं सर्व श्रेय मी यांना देतो. वरील हनुमंत थोरात सर आणि मयुरी खानविलकर यांना सोडलं तर तिन्ही मुली वयाने फार लहान आहेत तरी देखील उघडपणे त्यांनीं हे विषय माझ्याकडे स्वतः येऊन मांडले. जर एवढ्याशा वयात जर य सर्व मुली उघडपणे बोलू शकतात तर मग तुम्ही का नाही? मासिक पाळी बद्दलचे सर्व गैरसमज दूर बाळगून ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं सांगून जगासमोर उघडपणे बोला. मासिक पाळीची लोकांना लाज नको तर अभिमान वाटला पाहिजे एवढंच मला वाटते.
धन्यवाद...

तुमचाच 
आशु छाया प्रमोद


The Story Of Future Dancer

 Success

                         God of Cricketer किव्वा The best Cricketer कोण आहे असं विचारलं तर एक छोटासा मुलगा देखील न अडखळता सांगेल की God of Cricketer हा Master Blaster Sachin Tendulkar आहे. कारण तो succesful आहे. आणि त्याच्या Success मागचं कारण म्हणजे त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात अर्थात त्याने त्याच्या skill वर काम केलं म्हणून तो आज succesful होऊ शकला. आता तुम्हीच विचार करा ना ज्या व्यक्तीला शिक्षणात गोडी च नाही आणि त्याला शिक्षणाचं काही येतच नाही त्याने 10 वर्षे सुद्धा शिक्षणात घालवले तरी देखील तो तिथे तो आपला best देऊ शकतो का? आणि जर तो आपला शिक्षणात best देऊ च शकला नाही तर त्याला success मिळेल का? परंतू जर त्याने त्याच 10 वर्षामधून फक्त 5 वर्षे जरी त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दिले किव्वा त्याला येणाऱ्या एखाद्या skill वर काम केले तर तो आपला तिथे best देईल आणि जर तो तिथे best देईल तर त्याला success होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. कारण या जगात प्रत्यकेच व्यक्तीमध्ये एक skill आहे त्यातच तो succesful होऊ शकते. आता उदाहरणार्थ बघितलं तर जर आपण पाण्यात पोहणाऱ्या मासोळी ला धावायला शिकवायचं प्रयत्न करू आणि सस्याला पाण्यात पोहायला शिकविण्याचा प्रयत्न करू तर ससा पोहणे तर शिकणार नाहीच कधी पण त्याला येणारी जी running ची skill आहे ते ही तो विसरून जाईल. आणि मासोळी सुद्धा धावणे शिकणार तर नाहीच नाही परंतु तिला येणारी पोहण्याची skill सुद्धा विसरून जाईल. हल्ली जिकडे तिकडे हेच चालू आहे. एका Engineer आई वडिलांना वाटते की आपले मुलं आपल्या पेक्षा ही मोठे Engineer व्हावेत. एका Doctor आई वडिलांना वाटते की आपले मुलं आपल्या पेक्षा ही मोठे Doctor व्हावेत. पण त्यांच्यामध्ये जन्मजात असलेल्या skill मध्ये किव्वा त्यांच्या आवडी कडे दुर्लक्ष होतो. मग ती कहावत तर ऐकलीच असणार ना, “धड गाढव ना ब्रह्मचारीं.” म्हणजे आई वडिलांमुळे ज्या क्षेत्राकडे लक्ष देतात त्यातही ते best देऊ शकत नाही आणि skill किव्वा त्यांच्या आवडीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना ते ही करता येत नाही. मग काही मुले नशीब समजून पदरी पडलेलं काम करतात आणि काही मुले तर Dipression मध्ये जाऊन आत्महत्या करतात. आज मी तुम्हाला अशाच एका आई वडिलांची एक छोटीसी Story सांगतोय ज्यांनी फक्त स्वतःचा मुलगाच नाही गमावला तर या भारताने सुद्धा एक भावी Dancer गमावला.

Dancer

Sachin Tendulkar

It's not a suicide, it's murder.....

                          हि story कुठल्या छोट्याशा गावातील छोट्याशा घरातील मुलाची नाही तर ज्याचे आई वडील दोन्ही Doctor होते अशा सुशिक्षीत आणि मोठ्या शहरांच्या मोठ्या घरातील एका मुलाची आहे. ज्याने लहानपणा पासून Dancer व्हायचं स्वप्न बघितलं होतं. त्याला India's Best Dancer चा Aword जिंकायचं होतं. आणि तशी त्याची जिद्द ही होतीच. Dancing ही फक्त त्याची आवड न्हवती तर त्याच्यामध्ये Ek best Dancer व्हायची skill सुद्धा होती. फक्त गरज होती ती एका चांगल्या मार्गदर्शनाची. पण ते म्हणतात ना नशिबात जे असतं तेच घडतं. आई वडील हे दोन्ही Doctor असल्यामुळे त्या दोघांना हि वाटलं की आपला मुलगा हा आमच्या पेक्षाही मोठा Doctor व्हावा. त्या मुलाने आपली Dance Practice सोबत च चांगला अभ्यास करून 12th Exam मध्ये बऱ्यापैकी टक्के मिळवलीत. त्याच्या आई वडिलांनी त्याला MBBS ला Admission करून दिलं. त्यानेही आई वडिलांची इच्छा आहे म्हणून मन नसतांना सुद्धा हसत हसत Admission घेतलं आणि नियमित Collage ला जाऊ लागला. त्याने आपला अभ्यास आणि Dance Practice दोन्ही सोबत चालू ठेवली. MBBS ची exam चा result आला आणि त्या Exam मध्ये मात्र त्याने एकही subjects clear न्हवते केले. हे त्याच्या आई वडीलांना कळताच त्यांनी खूप ऐकवलं, मारलं सुद्धा आणि त्याची dance practice बंद करून नजर कैदेत ठेवलं आणि फक्त अभ्यास आणि अभ्यास करायला लावलं. त्या मुलाला कळलंच नाही की एवढं अभ्यास करून सुद्धा आपण paas का नाही झालोत. कारण त्याला Doctory चा अनुभव न्हवता असं ही नाही. घरातच दोन्ही आई वडील Doctor असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी अनुभव होता. एका doctor ला ज्या skill येतात त्या सर्व त्यालाही येत होत्या. परंतु मुळात त्याची आवड च न्हवती त्यामुळे तो एकही subjects clear करू शकला नाही. कारण फक्त Skill असून चालत नाही तर मनात त्याबद्दल आवड ही हवी जी त्याचं मध्ये न्हवती. आता त्याची Dance Practice बंद झाल्यामुळे आणि घरच्यांनी नजर कैदेत ठेवल्या मुळे तो पूर्णपणे Dipression मध्ये गेलेला होता. आणि याच कारणाने एका रात्री सर्व झोपल्यानंतर झोपेच्या Tablets खाऊन त्याने आत्महत्या केली. हि मला वाटते आत्महत्या नसून हत्याच आहे.

Suicide
                             माझा मुलगा माझ्याही पेक्षा मोठ्ठा Doctor व्हावा या इच्छापूर्ती साठी नाही फक्त त्या आई वडिलांनी आपला मुलगा गमावला तर या देशाने एक भावी Dancer सुद्धा गमावला. आज जसं God Of Cricketer म्हणून Master Blaster Sachin Tendulkar चं नाव Famous झालं आहे कदाचीत त्या मुलाचं देखील नाव Famous झालं असतं जर त्यानेही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केलं असतं. आवड आणि skill Dancer व्हायची होती पण आई वडिलांच्या इच्छापूर्ती साठी त्याने MBBS ला Admission घेतलं आणि ती कहावत आहे ना “धड गाढव ना ब्रह्मचारी” अगदी तसच नाही त्याला धड Doctor होता आलं आणि नाही Dancer. 

Conclusion:- 

                       माझं आई वडिलांना सांगणं आहे की, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय skill आहेत त्याची काय आवड आहे हे तपासा आणि तेच त्याला करू द्या स्कोप कुठं आहे नि कुठं जास्त पैसा मिळतो हे बघू नका. कारण त्याच्यामध्ये skill नाही आवड नाही तो तिथे कधीच आपला best देऊ शकत नाही आणि जर त्याने best दिलं नाही तर तो कधीच success होऊ शकत नाही. त्या मुलांवर आपल्या स्वप्नांचं दडपण टाकू नका. कोवळं वय असतं त्याचं थोडं ही मनाविरुद्ध झालं की चिड चिड व्हायला लागते आणि जर कमजोर हृदयाचे असतील तर ते स्वतःचं काही बरं-वाईट सुद्धा करू शकतात.

                                     माझं मुलांना देखील सांगणं आहे की, तुमच्यामध्ये काय skill आहेत ते एकदा बघा तुमची आवड काय आहे ते बघा आणि नंतर च समोर काय करायचं ते करा. माझा मित्र हे करते म्हणून मी पण करतो किव्वा माझी मैत्रीण ते करते म्हणून मी पण तेच करतो असं करू नका. 

           आयुष्यात Success व्हायचं असेल तर Career निवडतांनी तुमच्यामध्ये असलेली Skill आणि तुमची आवड काय आहे? हे एकदा नक्कीच बघा कारण या दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरवतात...


तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद

Navara Baykoch Bhandan

 भांडण: एक धोक्याची घंटा

                                                जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे पती-पत्नी चं नातं आहे. कारण एकदा भाऊ आपल्याला सोडून जाईल बहीण सोडून जाईल Girlfriend/Boyfriend, Friends सर्व सोडून जातील एवढंच नाही तर आई वडील सुद्धा आयुष्यभर साथ देत नाहीत पण पती आणि पत्नी कधीच एकमेकांना साथ सोडत नाहीत. एक वेळ तर अशी येईल की, आपल्या पोटचा पोरगा सुध्दा आपल्याला सोडून जाईल पण पती पत्नी कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत. पती-पत्नी हे दोघे जणू आयुष्य नावाच्या गाडीचे दोन चाक आहेत. त्यामधील एक चाक जरी थोडा ही का होईल डगमगला तर आयुष्य नावाच्या गाडीची वाट चुकेल आणि आयुष्य संपेल. आणि या मागचं एकमेव कारण म्हणजे भांडण आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की, नात्यामध्ये भांडण होणं गरजेचं आहे. ज्या नात्यात भांडण होत नाहीत त्या नात्यामध्ये प्रेम नाही. परंतु हा च तुम्हा सर्वांचा गोड गैरसमज आहे. नात्यामध्ये छोटंसं जरी भांडण होत असेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.
                                    आज मी तुम्हाला एका मध्यमवर्गीय परिवाराची छोटीसी Story सांगतोय. पती चं नाव रवी आणि पत्नी चं नाव अंजली होतं. रवी हा Goverment Office मध्ये Job ला होता आणि अंजली Housewife होती. दोघांचं ही लग्न होऊन आज जवळपास 20 वर्षे झाली होती त्यांना एक 17 ते 18 वर्षाचा मुलगा(राहुल) सुद्धा होता. आता तुम्हाला वाटत असेल की, है तिघेही गुण्या-गोविंदाने राहत असणार. तर तुम्ही चुकीचे आहात हे तिघेही कधीच गुण्या-गोविंदाने राहिले नाही कारण रवी आणि अंजली मध्ये क्षुल्लक कारणांवरून छोटं मोठं भांडण नेहमीच होत राहायचं. कधी रवी ला Office मध्ये उशीर व्हायचा तर अंजली त्याच्यावर ओरडायची तर कधी रवी Office मधून लवकर आला आणि अंजली त्याला घरात दिसली नाही तर रवी अंजलीवर ओरडायचा. कधी Market मधून वांगे आणले आणि आलू नाही आणले म्हणून भांडण व्हायचं तर कधी Market मधुन Fish आणलं Chicken नाही आणलं म्हणुन भांडण व्हायचं. कधी रवी अंजलीच्या Relative's मध्ये जात नाही म्हणून भांडण व्हायचं तर कधी अंजली रवीच्या Relative's चा मान ठेवत नाही म्हणून भांडण व्हायचं. रवी आणि अंजली ने ही सततची भांडणं होण्यामागची कारणं जाणून घेण्यासाठी मोठ्यांशी सल्लामसलत केलं परंतु त्यांनीही हेच सांगितलं की, “पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं होणं स्वाभाविक आहे. याबद्दल तुम्ही फार विचार करू नका हे तुमच्या दोघांमधलं प्रेम च आहे.” असं त्यांनी सांगितलं म्हणून दोघेही निवांत झाले परंतू त्यांच्या याच छोट्या मोठ्या भांडणाचा प्रभाव मात्र हळू हळू त्यांचा मुलगा राहुल वर व्हायला लागला याचा त्यांना जराही भान न्हवता. एक दिवस ये सर्व त्याच्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आणि त्याने स्वतःच्याच Room मध्ये Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Sucide Note मध्ये लिहून ठेवलं, “आई-बाबांच्या सततच्या भांडणाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहो.” 
                           मुलाचा Sucide Note वाचून दोघांचेही डोळे तर खुलले होते मात्र परिस्थिती अजूनही सुधारलेली न्हवती. त्या दोघांमधले होणारे सतत ची भांडणे आता वाढू लागली. परंतु मुलगा गेल्यामुळे दोघांनाही आया त्यांच्या एकटेपणा त्यांना छळू लागला होता. रवी office मध्ये काम करत असल्यामुळे का होईना त्याला फारसा फरक जाणवत न्हवता परंतु अजली मात्र घरात एकटी पडल्यामुळे तिला तिचा एकटेपणा अती छळू लागलेला होता. तिला घरात नेहमीच तिच्या मुलाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या, तिच्या डोळ्यासमोर सारखा राहुल चा फाशी लागलेला चेहरादिसत होता. आणि तिनेही ऐक दिवस ज्या Fan ला राहुलने फाशी लावून आत्महत्या केली होती त्याच Fan ला अंजली ने देखील स्वतःला फाशी लावून आत्महत्या केली होती. आणि Suside Note वर तिने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल च्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.” आता मात्र रवी चा Office मध्ये देखील मन लागायचा नाही. त्याच्या डोळ्यासमोर सारखं अंजली आणि राहुल चा फाशी लागलेला चेहरा दिसत होता आणि कानावर दोघांच्याही किंचाळ्या ऐकायला यायच्या. त्याला घरात सुद्धा जावसं वाटत न्हवतं म्हणून त्यानेही एक दिवस Office मधल्याच एका Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Suside मध्ये त्याने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल आणि माझी पत्नी अंजली या दोघांच्याही आत्महत्येला कारणीभूत आहे म्हणून मी आत्महत्या करतोय. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरवू नये.” एका छोट्याशा भांडणामुळे घरातील तिघांनीही आत्महत्या केली आणि त्यांचं अख्खं आयुष्य संपलं.
                             रवी आणि अंजली यांची story वाचून तर तुम्हाला कळलंच असेल की एक छोटंसं ही भांडण कसं अख्ख्या परिवाराच्या आयुष्याची राख-रांगोळी करू शकते. आपला हा खूप गोड गैरसमज आहे की पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही त्यांच्यामधील असणाऱ्या प्रेमामुळे होतात. वास्तविकरीत्या पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही एकमेकांना समजून न घेतल्या मुळे होत असतात. कारण लग्न जुळवतांनी आपण सर्व बघतो मात्र कधीच हे बघत नाही की मुलगा मुलगी एकमेकांना समजून घेऊ शकतात की नाही. मी माझ्या मागील blog (A social gamble एक समाजमान्य जुगार: लग्न) यामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलो की लग्न ठरवतांना मुलगा आणि मुलगी यांना हवा तेवढा वेळ द्या जेणे करून हे एकमेकांना समजू शकतील. कारण जर मुलगा मुलगी एकमेकांना समजू शकले नाहीत तर त्यांच्या मध्ये देखील रवी आणि अंजली सारखे भांडणं होतील आणि अख्ख्या परिवाराचं आयुष्य बरबाद होईल.

Conclusion:- 

                       पती-पत्नी च्या नात्यामध्ये भांडणं होत असतील तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे...कारण एक छोटंसं ही भांडण देखील विशाल रूप घेऊन अख्खं आयुष्य बरबाद करू शकते.

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

A social gamble एक समाजमान्य जुगार

जुगार




Jugar

                        तुम्हाला मला आणि आपल्यातल्या प्रत्येकच तरुणांना लहानपणा पासून आपले पालक एक गोष्ट सांगत असतात. ती अशी की बेटा, आयुष्यात कधीच जुगार खेळू नकोस. त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे. माझा त्यांच्या या गोष्टीला मुळीच विरोध नाही. आयुष्यात कधीच खेळ म्हणून अथवा Just एक Timepass म्हणून देखील जुगार खेळू नये. कारण, Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती सुद्धा परत जुगार नक्की खेळेल यात काडी मात्र शंका नाही. एकदा फक्त Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती जर का हरला तर तो जिंकण्याच्या उमेदीने परत नक्कीच खेळणार आणि जर का तो जिंकला तर आणखी जिंकण्याच्या लालच मुळे तो परत नक्कीच खेळेल आणि हाच त्याच्या Timepaas एक दिवस त्याची सवय होऊन जाईल. आणि सवय ही वाईट गोष्टींची असो वा चांगल्या गोष्टींची ती कायम वाईट च असते. हे सगळं तर तुम्हाला तुमच्या पालकांनी सांगितलं च असेल वा तुम्ही कुठंतरी नक्कीच वाचलं असेल. यात काही नवीन नाही आहे पण आता मी जे सांगणार आहे ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. जे आई वडील किव्वा जे पालक आपल्याला लहानपणा पासून सांगत आलीत की, बेटा जुगार खेळू नकोस. तेच आई वडील स्वतःच, स्वखुशीने आपल्याला जुगार खेळायला बसवतात जुगार खेळायला लावतात. आता तुम्ही विचार कराल की, “हे कसं काय शक्य आहे? माझ्या तर आई वडिलांनी कधीच मला जुगार खेळायला लावलं नाही....” तर हेच मी या Blog Post मध्ये सांगायला आलोय.
                       मुलगी 21 वर्षाची झाली आणि मुलाला नोकरी मिळाली किव्वा तो थोडाफार कमवायला लागला की त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट आपोआप Add होऊन जाते ती म्हणजे लग्न....! मुलगा नोकरी ला किव्वा काही थोडे फार पैसे कमवायला लागेपर्यंत त्यांचे आई वडील थकायला लागतात त्यांच्यासाठी घरी हाथभार लावायला कुणीतरी सोबत हवी म्हणून मुलगा कमवायला लागल्यावर लग्न करणे साहजिकच आहे यात काही शंका नाही. तसेच मुलगी ही कधीच आपल्या आई वडिलांना बोझ राहत नाही परंतु तिला वयात आल्या नंतर घरात एकटं ठेवणं बरं दिसत नाही म्हणून तिचाही लग्न करणे साहजिकच आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता हे लग्न नाही तर एक समाजमान्य जुगार च आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. लग्न हा एक समाजमान्य जुगार आहे.....! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पवित्र अशा लग्नाला जुगाराचं नाव का देतोय? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही मी देतोय.....

एक समाजमान्य जुगार: लग्न

Marriage
                                जुगार खेळणाऱ्याला नशीबाने साथ दिली तर रस्त्यावर राहणारा देखील मोठा बंगला बनवू शकतो आणि जर का जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला नशीबाने साथ दिली नाही तर एका बंगल्यात राहणारा देखील रस्त्यावर येतो. अगदी तसच लग्नाचं ही झालं आहे. Partner योग्य मिळाला तर एका झोपडी मध्ये देखील स्वर्ग असल्यासारखं वाटेल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्या मध्ये सुद्धा नरक यातना सहन कराव्या लागतील. पण हे तर नशीबावर अवलंबून आहे यात आपण माणसे काय करू शकतो? यात आई वडिलांची कुठं चुकी आहे? असं तुम्हाला वाटत असेल. तर होय तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हे नशीबावर अवलंबून आहे. पण जर का आपण लग्न ठरविण्याच्या पद्धतीवर अगदी बारकाईने लक्ष दिलं तर कळेल की मी लग्नाला जुगार का म्हटलोय...
                            अख्खं आयुष्य जातं एका माणसाला ओळखण्यात आणि हे 1 तासाच्या Meeting मध्ये ठरवतात की लग्नासाठी मुलगा/मुलगी योग्य आहे की नाही. कित्येकदा तर मुलीला विचारलं देखील जात नाही की तिला तो मुलगा आवडतो की नाही. अरे आयुष्यभर त्या मुलीला राहायचं आहे ना त्या मुलासोबत मग एकदा तिला विचारा ना.....माझ्याच वर्गातील एका मुलीचा लग्न तिच्या वडिलांनी तिच्याच आत्याच्या मुला सोबत ठरवलं...का तर म्हणे मुलगा चांगला नौकरी वर आहे. अरे लग्न त्या मुलासोबत लावायचं आहे की त्याच्या नौकरी सोबत...त्या मुलीच्या डोळ्यात च दिसते की तिला तो मुलगा मुळीच आवडत नाही हे तिच्या वडिलांना दिसत नसेल का? दिसत ही असेल कदाचित पण प्रत्येक आई वडिलांना जसा विश्वास आहे की ते त्यांच्या मुलांचं/मुलींचं वाईट होऊ देणार नाही अगदी तसाच तिच्याही वडिलांना विश्वास आहे पण हा विश्वास जरा अती होत चाललाय...आणि ते म्हणतात ना “अती तिथं माती” तसाच हा अती विश्वास देखील मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलगा चांगला दिसला की मुलीचं लग्न ठरवून टाकतात आणि मुलगी चांगली दिसली की मुलाचं ही लग्न ठरवून टाकतात त्या 1 तासाच्या Meeting मध्ये आणि मग नंतर 1 महिन्यात साखरपुडा आणि दोन महिन्यात लग्न करतात....मग त्यांच्या मध्ये पटलं नाही किव्वा काही वर्षाने तलाक झालं तर नशीबाला दोष देऊन मोकळे होतात. मला आता सांगा यात नशीबाचा काय दोष? आपण एक साधा Shirt देखील घेण्यासाठी जेव्हा shop मध्ये जातो तेव्हा कित्ती वेळ विचार करतो... Shirt हा Jeans वर शोभेल का? त्यांचा रंग आपल्यावर शूट होईल का? shirt ची Quality कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो Shirt आपल्या Budget मध्ये बसेल का? एवढा विचार करतो तो फक्त एक Shirt घेण्यासाठी मग हा तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे विचार करायला नको.. 1 तासाच्या Meeting मध्ये Partner दिसायला चांगलं वाटलं किव्वा चांगली नोकरी आहे तर लग्न लावून द्यायचं. मग हा जुगार नाही तर काय आहे? Partner योग्य मिळाला तर एका झोपडीचं देखील स्वर्ग होईल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्याचं देखील नर्क व्हायला उशीर लागणार नाही...

Conclusion:-

                       माझा लग्नाला मुळीच विरोध नाही. मला हे देखील मान्य आहे की, आई वडील कधीच मुलांचं वाईट सोचनार नाही पण तो आधी सारखा जमाना आता राहिलेला नाही. इथे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. लग्न हा त्या मुला-मुलीचा आयुष्यभऱ्याचा प्रश्न असतो त्यासाठी ती 1 तासाची Meeting पुरेशी नाही आहे. त्या मुला-मुलीला हवा तेवढा वेळ घेऊ द्या, त्यांना एकमेकांना समजून घेऊ द्या आणि नंतर च लग्न ठरवा. कारण हल्ली कित्येक लग्न तुटून राहिलेत त्याचा सर्वात महत्वाचा कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे हाच आहे.

Important Note:-

                             मी इथे Arrange Marriage बद्दल Problem Share केलो याचा अर्थ असं नाही की माझा Love Marriage ला पूर्ण समर्थन असेल. मुलं-मुली लग्नाच्या वयात आले म्हणजे असं नाही की ते त्यांचा Life Partner स्वतः निवडू शकतात. तुम्हाला Love Marriage करायचं असेल तर करा पण आई वडील किव्वा मोठ्यांच्या सल्ला घेऊन च समोरचं योग्य तो Decision घ्या..शेवटी लग्न हा आयुष्यभऱ्याचा प्रश्न आहे......

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

Alcoholic Addiction

 कोवळ्या वयात दारूचं व्यसन : ही धोक्याची घंटा

                        मी काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राच्या घरी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. काही करणास्तव तो मला घरी मिळाला नाही परंतु त्याची आई मिळाली. मी त्याच्या आई सोबत बोलायला गेलो तर त्याची आई मला रडतांना दिसली. म्हणून मी त्यांना रडण्याचं कारण विचारलं तर त्या काकूंनी मला सांगितलं की, बेटा माझा मुलगा (माझा मित्र) हल्ली खूप दारू प्यायला लागला आहे. मी काकूंना समजावलो आणि त्या शांत झाल्या. मग काकूंनी मला त्याच्या रूम मध्ये बस म्हटलं म्हणून मी मित्राची वाट बघत बसलो. मला कधीच वाटलं नव्हतं की, हा माझा मित्र एवढ्या लवकर दारू च्या विळख्यात पडेल. तसा तर तो कॉलेज इव्हेंट मध्ये मित्रांसोबत कधी कधी बियर प्यायचा. तर कधी मित्रांच्या वाढदिवसामध्ये घ्यायचा पण दारू चं व्यसन त्याला एवढं लवकर लागेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. असा विचार करत होतो तेवढ्यात माझा मित्र आला. आम्ही थोडा वेळ बोललो, त्याला थोडं समजावलो परंतु मला वाटलं नाही की त्याच्या डोक्यात काही गेलं असेल कारण ते म्हणतात ना ज्या व्यक्तीला एकदा दारू चं व्यसन लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. अगदी तसच मलाही वाटलं म्हणून मी माझ्या मित्राची रजा घेत घरी परत यायला तिथून निघून गेलो.
                     मी घरी तर पोहोचलो परंतु मला घरी याच प्रश्नाचं उत्तर मिळत न्हवतं की, एवढ्याशा लहान वयात तो दारू च्या विळख्यात अडकला कसा? कारण त्याची वय देखील फारशी न्हवतीच...! तो माझा मित्र फक्त इयत्ता ९ वी चा विद्यार्थी होता आणि तो माझ्याच कॉलेज मध्ये शिकत होता. एकदा कॉलेज मध्ये आम्ही भेटलो एक-मेकांचे विचार पटले आणि लगेच मैत्री झाली. खरं सांगायचं झालं तर त्याच्या या परिस्थिती चा कारण मी देखील आहों. तो माझा मित्र दारू शी नफरत करणारा पण मित्रांच्या आग्रहास्तव बियर प्यायला लागलाय याची थोडी फार कल्पना मला होती. मी त्याचं वेळी त्याला या पासून थोडा दूर केलो असतो तर आज कदाचित तो दारू च्या विळख्यात अडकला नसता याचंच मला फार दुःख झालं. मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे मला त्याची फार चिंता वाटू लागली म्हणून मी इतर मित्रांशी, माझ्या काही शिक्षकांशी चर्चा करून तसेच इंटरनेट च्या माध्यमांतून याबद्दल माहिती गोळा केलो. मिळालेल्या माहिती मधून मला काही आश्चर्यजनक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या...!
alcohol-consumption-increasing-in-teenagers

               आपल्याकडे मतदान करण्यासाठी 18 वर्षे वय ठरवली आहे, लग्न करण्यासाठी 21 वर्षे वय ठरवलेली आहे मात्र मद्यपान करण्यासाठी 21 वर्षे वय असावी की 25 वर्षे वय असावी याबद्दल आजही वादविवाद सुरूच आहे. यामध्ये काही लोकं असे म्हणतात की, जर मतदानाचा हक्क 18 वर्षे आहे तर मद्यपान करण्यासाठी देखील वय 18 असावी तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की, जर लग्न करण्याची वय 21 असेल तर मद्यपान करण्याची वय देखील 21 करावी. पण मला असं वाटते की, आता ही वय 12 वर्षे असावी. कारण 12 वर्षाखालील तरुण देखील हल्ली पार्ट्या, Birthday, लग्न तसेच इतर ही कार्यक्रम मध्ये सर्रास दारू पितांना आढळतात. आणि ही बाब भावी पिढी साथ फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. पण आता मला प्रश्न पडतो की, या तरुण वयातील मुलांना दारू चं व्यसन कसं जळलं असावं?
Beer

          “बियर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतेस” असं सांगून मित्र आग्रह करतात आणि मग तो पण बियर घ्यायला सुरवात करतो. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. असच काहीसं माझ्या मित्रासोबत देखील झालं होतं. कित्येकदा तर स्वतः पालक देखील आपल्या मुलांना बियर प्यायला प्रोत्साहन करतात. कारण बियर मुळे ताण कमी होतो, झोप चांगली लागते, असे काही गैरसमज पसरलेले आहेत. बरं फक्त मुलं च दारू पितात असं देखील नाही तर यात मुलींचा प्रमाण खूप आहे. काही पालक देखील स्वतः आपल्या मुलींना दारू प्यायला परवानगी देतात. माझी खूप जवळची मैत्रीण आहे गौरी. मी तिला एकदा सहज गंमत म्हणून बियर प्यायला चल म्हटलो तर तिने मला म्हटलं, “आशु तू मला गंमत म्हणून जर का हे विचारत असशील तर वेगळी गोष्ट आहे परंतु तू खरचं म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला तयार आहे. कारण माझ्या घरी अशीही बियर प्यायची परवानगी आहे. परंतु मी आज पर्यंत कधीच पिली नाही. जर तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला येते.” यावर मी तिला म्हटलो, “बाळा गौरी मी नेहमी म्हणत असेन की आई वडिलांचं ऐकावं परंतु अशा चुकीच्या सवयी त्यांनी म्हटलं तरी देखील लावायचं नाही. मी ही दारू पित नाही आणि तुला ही दारू पिऊ देणार नाही.” माझी एक दुसरी मैत्रीण होती जिचं नाव मी सांगत नाही पण तिलाही सहज एकदा गंमत केलो चल दारू प्यायला म्हणून तर तिने ही मला म्हटलं की, मी दारू तर पित नाही पण बियर पिते. जेव्हा मी तिला बियर प्यायचा कारण विचारलो तर ती मला म्हणाली होती की, बियर ने आपली त्वचा मऊ होते. यात किती सत्यता आहे हे मला माहिती नाही. कारण, इंटरनेट वर याबद्दल मी देखील वाचलोय परंतु हे जरी सत्य असेल तरी देखील त्वचा मऊ करायला हे एकमात्र उपाय तर नाही ना.... Alovera चा गर काढून त्याचा रस बनवून त्यात हळदी आणि चवीनुसार थोडा मीठ टाकून फक्त 1 आठवडा ब्रश करायच्या आत पिलं तर तुमची त्वचा फक्त मऊ च होणार नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग, मुरूम सुद्धा गायब होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर Glow येईल. असे कित्येक उपाय आहेत. पण अशा भाकड कथा दंतकथेमध्ये सर्रास वाचायला मिळतात. आणि ह्याच दंतकथा कदाचित कारणीभूत ठरत असतात बियर चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भावी पिढी साठी धोकादायक ठरू शकते.
Drinks

                            या किशोरवयीन मुलांचं दारू कडे Attraction का वाढत चाललं यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी काही मुलांशी संवाद साधला त्यावरून त्यांच्या असं निदर्शनास आलं की, लग्नसमारंभ, वाढदिवस वा इतरही घरगुती पार्ट्यांमध्ये आपल्या आई वडील किव्वा इतर नातेवाईक दारू पिऊन नाचतात, मज्जा करतात, है बघून किशोरवयीन मुलं Attract होतात. आणि मुलांना मिळालेलं शैक्षणिक अपयश, घरगुती तणाव किव्वा हल्ली दारू पिण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रेमभंग या सर्वांचा ताण कमी करण्यासाठी हल्लीची किशोरवयीन मुलं दारू कडे आकर्षित होतात. तसेच दारूची उपलब्धता हे देखील हल्लीच्या मुलांचं दारू पिण्याचं कारण आहे. आपल्या महाराष्ट्रात 2000 मध्ये दारूचे फक्त नऊ कारखाने होते तर आज त्यांची संख्या 70 ते 80 च्या घरात गेली आहे. किशोरवयीन मुलांची दारू पिण्याची सुरवात ज्या बियर पासून सुरू होते ती बियर 2004 ते 2005 या काळात सरासरी 2.5 लाख लिटर व्हायची तर आज तिचं 5 लाख लिटर म्हणजेच दुप्पट व्हायला लागली आहे यावरून च दारू ची उपलब्धता आपल्या लक्षात येते. National Health सव्‍‌र्हेच्या २००९ च्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटामधील मद्याचे प्रमाण हे मुलांमध्ये ११ टक्के आहे, तर मुलींमध्ये १ टक्का आहे. २० ते २४ वयोगटातील युवकांमध्ये हे प्रमाण २८.८ टक्के आणि युवतींमध्ये १.४ टक्के आहे. ही माहिती देणाऱ्या मानसशास्त्रज्ञ कीर्तीसुधा राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुली आणि युवतींमध्ये मद्यपानाचे प्रमाण वास्तवात अधिक आहे; परंतु सामाजिक दडपणामुळे मुली याबाबत खुलेपणाने बोलत नसल्याने ही आकडेवारी अर्धवट सत्य मांडत आहे.
                                                                                   अशा किशोरवयीन मुलांची वेळीच समजूत काढली नाही तर भावी पिढी व्यसनाधीन होण्यास फारसा वेळ लागणार नाही. पण हल्लीचे आई वडील मुलांची समजूत न काढता जर बियर दारू अथवा सिगरेट पितांनी आढळल्यास त्यांच्यावर रागावतात. मुलगा सिगरेट दारू किव्वा कुठलाही अमली पदार्थाचा सेवण करतांना आढळल्यास त्यांना रागवण्यापेक्षा त्यांचे तोटे त्यांच्या लक्षात आणून द्या मुलांशी मोकळा संवाद साधा. मुलांशी जर तुम्ही मोकळा संवाद साधला तर मुलांना बाहेर मित्रांची फारशी गरज भासणार नाही आणि वाईट मित्रांच्या संगतीने मिळालेले वाईट सल्ले त्यांना मिळणार नाही. आणि ते दारू च्या आहारी जाणार नाहीत. 

टिपः प्रस्तुत लेख मध्ये मी काही चुकीचं लिहिलं असल्यास मला मोठ्या मनाने माफ करा. प्रस्तुत लेख Loksatta News चा आधार घेऊन लिहिलेला आहे.

संपूर्ण लेख वाचल्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहो....काही चुकलं असेल किव्वा तुमच्या काही tips असतील तर त्या comment द्वारे मला नक्की कळवा....
धन्यवाद.....!

Mahan Guru

 प्रथम गुरू कोण? 


                      आपल्या आयुष्यात एक तरी गुरू असणे फार गरजेचं आहे. कारण एक गुरू हा नेहमी आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीची जाणीव करून देत असतो. यशाच्या शिखरावर पोहोचवायला तो योग्य वळण आपल्याला दाखवीत असतो. “गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञान विना आत्मा नाही” असं म्हणतात ते योग्यच आहे.कारण आपण गुरू विना यश कधीच प्राप्त करू शकत नाही. पण तुम्हा सर्वांना आता एक प्रश्न पडला असेल ना की, आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू कोण? आणि त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी ठेवण्याचं कारण काय? तुम्हा सर्वांना जर या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ही Blog Post शेवट पर्यंत नक्की वाचा....तुम्हाला मी या पोस्ट मध्ये याचं सविस्तर उत्तर सांगेन. 
                            मी इयत्ता पाचवी मध्ये असतांना मला माझ्या शाळेतील एका शिक्षकांनी प्रश्न विचारलं होतं की, आशु तुझ्या आयुष्यातील तुझा प्रथम गुरू कोण आहेत? तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. गुरू काय आहे? गुरू कोण आहेत? आपल्या आयुष्यात गुरू चं स्थान काय आहे? अशा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्यावेळी माझ्याकडे न्हवते. पण माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की, माझे प्रथम गुरू हे माझे आई वडील आहेत. आणि माझेच नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीचे प्रथम गुरू हे त्यांचे आई वडील च असतात. मी लगेच त्या शिक्षकांना प्रश्न विचारलो की, सर आई वडील च आपले प्रथम गुरू का? तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं की, कारण आपल्याला त्यांनी जन्म दिलं, त्यांच्यामुळेच आपण हे सारं जग बघतोय त्यामुळे आपले प्रथम गुरू आई वडील आहेत. सरांचं है उत्तर ऐकून मी त्यावेळी तर नक्कीच समाधानी झालो होतो परंतु आज मी त्या उत्तराने परिपूर्ण समाधानी नाही आहो. कारण, मला वाटते की ते उत्तर परिपूर्ण नाही तर अर्धवट उत्तर आहे. मी त्या शिक्षकांना चुकीचं समजत नाही आहे कारण मला वाटते की, त्यांनी ही मला समजेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला असेल त्यामुळे त्यांनी कदाचित मला अर्धवट उत्तर सांगितलेलं असेल कारण त्यावेळी माझी वय लहान होती आणि त्यामुळे मला फारशी जाणीव न्हवती. पण जसं जसं माझं वय वाढलं तसं तसं मला कळायला लागलं की आपले प्रथम गुरू कोण आहेत? आणि आपण त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी का ठेवतो? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मी अनुभवलेल्या माझ्या काही गोष्टींवरून सांगण्याचा प्रयत्न करतोय.
Aai Baba
                                    माझे वडील आणि माझी आई दोन्ही ही १० वी नापास आहेत. परंतु याची मला मुळीच लाज नाही तर मला गर्व आहे. कारण, त्यांनी जे काही मला शिकवलं आहे ना ते या जगातील कुठलीच शाळा, कुठलीच University किव्वा कुठलेच Teacher शिकवू शकले नाहीत आणि आयुष्यात कधीच शिकवू शकणार ही नाही. मला माझ्या आई वडिलांनी नाही फक्त जन्म दिलं, नाही फक्त मला हे जग दाखवलं तर या जगात जगणं त्यांनी मला शिकवलं. पडल्यानंतर स्वतः कुणाच्याही आधारा विना उभं राहायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मरायला शिकवलं. स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं कारण माझ्या आई वडिलांना वाटतं की, माझ्या मुलाने यशाचं शिखर गाठावं....मी नेहमी च ऐकत आलोय की, पैशाशिवाय जा जगात काहीही करू शकत नाही पण खिशात पैसा नसतांना देखील समाजसेवा कशी करायची ते मी माझ्या वडिलांकडून शिकलो, राजकारण कसं करायचं ते ही मी माझ्या वडिलांकडून शिकलो आणि घरातील एका पोळी मधून निम्मी पोळी खाऊन निम्मं उपाशी राहून भुकेलेल्याचं पोट कसं भरायचं ते मी माझ्या आई कडून शिकलो, पैशांची काटकसर कशी करायची ते देखील मी माझ्या आई कडून शिकलो. म्हणून च मी माझ्या आई वडिलांना कायम गुरूच्या प्रथम स्थानी ठेवतो.
                         आता तुम्हाला वाटत असेल की, हे तर मी फक्त माझ्या आई वडिलांबद्दल बोलतोय. तर याचं उत्तर “नाही” असं आहे कारण, या जगातील कुठलेही आई वडील असोत मग ते पदवीधर असोत किव्वा मग त्यांनी शाळेतील पायरी सुद्धा कधी ओलांडली नसेल तरी देखील ते आई वडील आपल्या मुलांसाठी प्रथम गुरू आहेत. कारण त्यांनी नाही फक्त मुलांना जन्म दिलं, नाही फक्त त्यांना हे जग दाखवलं तर या जगात जगायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं, स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं. मुलांच्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मारायला शिकवलं कारण या जगातील प्रत्येक च आई वडिलांना वाटते की, त्यांच्या मुलांनी यशाचं शिखर गाठावं..मग ते शिक्षित असोत वा अशिक्षित असोत. आई वडील मुलांना जे शिकवतात ते या जगातील कुणीही शिकवू शकत नाही मग ते कितीही महान असले तर आई वडिलांची कमी पूर्ण करून देऊ शकत नाही. त्यांच्या सारखं शिकवू शकत नाही म्हणून मी नेहमीच म्हणतोय की, आई वडील हेच आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू आहेत.        
         

Conclusion:- 

                      मला या Blog Post मधून हेच सांगायचं होतं की, आई वडील हेच आपले प्रथम गुरू असतात. कारण, ते जे शिकवतात ते या जगातील कुठलीच University असो वा कुठलाच Teacher असो शिकवू शकत नाही. तराजू च्या एका पारड्यात जगातील सर्व गुरू ठेवा आणि एका पारड्यात फक्त आई वडिलांना ठेवा आणि बघा आई वडिलांचाच पारडा भारी असेल.....
Happy Marriage Anniversary mammi papa
             आज ही पोस्ट लिहिण्याचा कारण की, आज माझ्या गुरूंचा अर्थात माझ्या आई वडिलांची Marriage Anniversary आहे. मला ही त्यांच्या साठी काहीतरी भेट द्यायची होती पण काय देऊ त्यांना भेट हाच मला प्रश्न पडला होता कारण आज जे काही आहे माझ्याकडे ते सर्वस्व त्यांचंच आहे. आज मला एक रुपयाचं चॉकलेट घ्यायला सुद्धा मला त्यांनाच पैसे मागावे लागतात तर मी त्यांना काय भेट देऊ शकतो. मी त्यांनी काही अनमोल भेट देऊ शकत नाही पण एक मात्र नक्की की, त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
Happy Marriage Anniversary मम्मी पप्पा
तुमचाच
आशु छाया प्रमोद

टिपः छाया हे नाव माझ्या आई चे आहे आणि प्रमोद हे नाव माझ्या वडिलांचं आहे. मी नेहमी आपल्या नावासोबत आई वडिल दोघांचं नाव लिहितो कारण माझ्या नावावर दोघांचाही समान हक्क आहे म्हणून.......

Ek Pravas

 एक अनोळखी वृद्ध व्यक्तीशी भेट......

Nagpur Bus Stop
 
                              एका तरुण मुलाचं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याला Job चं करियर चं अर्थातच त्याला भविष्याची चिंता वाटू लागते.  अगदी तसच मलाही माझ्या भविष्याची चिंता वाटू लागली म्हणून मी जॉब शोधायला लागलो. आताच काही दिवसापूर्वी एका कंपनी मधून मला Training साठी कॉल आला होता म्हणून मी नागपूर ला जायला गेलो. मी Nagpur ला पहिल्यांदाच गेलो होतो. एका अनोळखी शहरात अनोळखी कंपनी मध्ये अनोळखी लोकांसोबत तब्बल ०५ दिवस घालवलो. मला त्या कंपनी मध्ये काम आवडलं नाही म्हणून मी घरी परत यायला तिथून निघालो पण जातांना जो मनात उत्साह होता तो आता नाहीसा झालेला होता कारण, एवढे ०५ दिवस देऊन ही माझ्या मनाला पटेल असं काम मिळालेलं न्हवतं म्हणून मी जरा नाराज होतो. कंपनी च्या रूम मधून Bus Stop वर आलो. Bus Stop च्या एका बाजुला एक वृद्ध व्यक्ती बसलेले दिसले. त्यांच्या कपाळावर पडलेल्या रेषा स्पष्ट सांगत होत्या की, ते खूप चिंताग्रस्त असावेत म्हणून मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. उतार वयात माणसाला फक्त दोन च चिंता असतात. एक म्हणजे मुला-बाळांचं भविष्य व लग्न आणि दुसरं म्हणजे उतार वयात मुलांकडून मिळायला हवा तो आधार मिळेल की नाही. या मधून त्या काकांना कुठली चिंता असेल म्हणून मी सहज विचारायला त्यांच्याशी बोलायला गेलो.

                  “हॅलो काका, कुठं राहता तुम्ही?” असं त्यांना विचारताच त्यांनी माझ्याकडे बघत विचारलं, “कोन आहेस बेटा तू?” मी त्यांना सांगितलो, “काका माझं नाव आशु आहे. मी खुप दुर वरून इथे जॉब साठी आलो होतो परंतु जॉब मिळाली नाही म्हणून जरा बरं वाटत नाही आहे. तुम्ही इथे एकटेच बसले दिसले आणि मला वाटलं तुम्हाला देखील काही समस्या असेल म्हणून तुमच्याशी बोलायला आलो.” “जॉब शोधायला आला आहेस पण तुझी वय फार जास्त दिसत नाही आहे. काय शिक्षण झालं आहे तुझं?” असं त्यांनी मला विचारलं म्हणून मी त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलो, “काका, माझं शिक्षण B.com Final चालू आहे.” यावर त्यांनी मला म्हटलं, “अरे मग शिक्षण पूर्ण कर आणि मग जॉब शोध मिळेल तुला नक्की जॉब घाई कशाला करतोस. वेळेच्या आत आणि योग्यते पेक्षा जास्त कुणालाही मिळत नाही. म्हणून आधी शिक्षण पूर्ण कर मग चांगली जॉब मिळेल तुला.” मी होकारार्थी मान हलवत म्हटलो, “होय काका मिळेल जॉब त्यासाठीच आता पासून प्रयत्न करणे चालू आहे माझं” “छान...! असच आयुष्यात प्रयत्न करणं कधीच सोडू नको बेटा” असं त्यांनी मला म्हटलं. “होय काका” असं म्हणत मी त्यांना परत बोललो, “काका माझं तर ठीक आहे पण तुम्ही देखील फार चिंताग्रस्त दिसत आहात, नक्की काय कारण या चिंतेचं?” माझं हे वाक्य ऐकताच ते परत चिंताग्रस्त झाले त्यामुळे  त्यांना परत म्हटलो, “अहो काका, बोला हो.... बोलल्याने दुःख हलकं होईल तुमचं.” असं म्हणताच त्यांनी सांगायला सुरवात केली, “तुला माहिती आहे या जगातील anmol bhent प्रेम आहे.(अनमोल भेट काय आहे हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा)आमची अपेक्षा नाही आहे बेटा की आमच्या मुलाने आम्हाला महागड्या गाडी ने फिरवावे किव्वा महागडे भेटी द्यावे. आमची आमच्या मुलांकडून एवढीच एक माफक अपेक्षा आहे की, उतार वयात मुलाने दोन शब्द प्रेमाने बोलावे. उतार वयात आम्हाला आधार द्यावा. पण हल्ली च्या मुलांना एवढी वेळ कुठं असते. सकाळी उठून office मध्ये जातो आणि रात्री सुद्धा उशिरा येतो. त्याला वाटते की आई बाबांना पैसे दिले म्हणजे झालं पण बेटा आम्हाला पैशाची गरज नाही तर त्याच्या प्रेमाने बोललेल्या दोन शब्दांची गरज आहे.” यावर मी त्यांना म्हटलो, “अहो काका, हल्लीचं काम च तसं असतं नाही वेळ काढू शकत परिवारासाठी.” यावर ते म्हणाले, “असं नाही आहे बेटा की त्याला परिवारासाठी वेळ नाही आहे. त्याचा ऑफीस शनिवार ला बंद असतो आणि तो त्यादिवशी आपल्या परिवारासोबत म्हणजेच बायको आणि मुलांसोबत Hanuman Mandir मध्ये पूजा करायला जातो. कारण ती Hanuman चा परम् भक्त आहे.” त्यांना तिथेच थांबवून त्यांना विचारलो, “मग काका तो तुम्हाला सोबत का घेऊन जात नाही...तुम्ही Hanuman ला मानत नाही का? तुम्ही त्यांच्या परम् भक्त नाहीत का?” त्यावर ते पुढे सांगू लागले, “तसं नाही आहे बेटा, मी खूप मोठा भक्त आहो Hanuman चा अर्थात माझ्यामुळेच तो देखील हनुमानाची भक्ती करायला लागला. त्याचा Business सुद्धा हनुमान च्या कृपेने झालाय. पण त्याच्या पत्नीला आमच्या सोबत फिरायला कदाचित लाज वाटत असेल म्हणून तो आम्हाला घेऊन जात नाही. तो आम्हाला घेऊन जात नाही याला माझा विरोध नाही पण बेटा देवाला जेवढा वेळ देतो त्यामधला थोडा वेळ तरी आम्हाला द्यायला पाहिजे हिच माझी माफक अपेक्षा आहे.” “मग मला माफ करा काका यात तुमच्या मुलाची चुकी नाही यात तुमची चुकी आहे.” असं मी त्यांना म्हटलो. यावर त्यांनी मला विचारलं, “बेटा तो आम्हाला वेक देत नाही देवाला देतो यात माझी काय चुकी?” त्यावर मी त्यांना म्हटलो, “मला एक सांगा तुमचा मुलगा हरला तेव्हा त्यांची सांत्वना करायला काय करत होतात?” यावर त्यांनी मला उत्तर दिलं, “बेटा मी त्याला म्हणत होतो की, देवावर विश्वास ठेव तो सगळं ठीक करेल.” यावर मी त्यांना लगेच म्हटलो, “मग आता मला एक सांगा काका जेव्हा तो जिंकत होता तेव्हा तुम्ही त्याला काय सांगता होतात किव्वा त्याला काय करायला लावत होतात?” यावर ते म्हणाले, “बेटा तो जिंकला की त्याला आम्ही हनुमान चं नाव घ्यायला सांगत होतो आणि त्याला सांगत होतो की, देव सर्वस्व आहे तो कधीच कुणाचं वाईट करत नाही चांगलं च करतो फक्त त्याचं नाव घेत जा...” मी यावर त्यांना म्हटलो, “अहो काका, तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणा पासून हेच सांगत आले की, तो हनुमान च सर्वस्व आहे तर तो तुम्हाला सर्वस्व का मानेल?” “मला काही समजलं नाही बेटा...” यावर काकांनी मला म्हटलं. मी त्यांना म्हटलो, “काका, लहानपणी आपला मन कोवळा असते हे तुम्हाला ही माहिती आहे. त्याच्या मनात आपण जे टाकू ते त्यालाच धरून बसतात मग त्याचा परिणाम काय होईल किव्वा काय नाही याचा विचार ते कधीच करत नाहीत. मुलगा हरला पडला की त्याला देवाचं नाव घ्यायला सांगतो पण त्याला सांगत नाही की उठायचं प्रयत्न केलास तर तू स्वतःच उठू शकतो. मग तो जिंकला की त्याला आपण नेहमी सांगतो की हे सर्व देवाची च कृपा आहे म्हणजे त्याचं सर्व क्रेडिट आपण देवाला देतो पण त्याला हे सांगत नाही की आई वडिलांचं आशीर्वाद सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे. या सर्व प्रकारामधून त्याला असं वाटायला लागतं की, देव हेच सर्वस्व आहेत आई वडील नाही म्हणून हल्ली ची मुलं आई वडिलांना नाही तर देवाला जास्त वेळ देतात त्यांनाच पूजतात. आई वडिलांना लाथा मारून देवाच्या पायावर डोकं टेकतात. कारण  लहानपणा पासून सांगितलेलं असतं की, देव च सर्वस्व आहेत आई वडील नाही.” माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले “तुझं बोलणं अगदी खरं आहे बेटा मी माझ्या मुलाला लहानपणा पासून च देव हेच सर्वस्व आहे असं सांगत आलो आणि कदाचित हेच कारण असेल की तो आज देवाला वेळ देतो पण मला नाही.” दुपारचे ०२ वाजले होते आणि मला Nagpur वरून गावी यायचं होतं म्हणून मी त्यांना म्हटलो, “काका आता मला निघायला हवं गावी जायला मला ०३ तास लागतात.” असं सांगून मी त्यांचा निरोप घेतलो आणि ते ही त्यांच्या घरी जायला निघाले.

Conclusion:- मी असं म्हणत नाही की देवाची पूजा करू नका. त्यांना मानू नका पण आई वडिलांना लाथा मारून देवाच्या पाया पडणे हे तर चुकीचे आहे ना...देवाला माना, पूजा करा देवाची पण त्या आधी आपल्या आई वडिलांना वेळ द्या, त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोला. आई वडील च सर्वस्व असतात. आई वडिलांची सेवा केली तर कुठल्या मंदिरात सुद्धा जायची तुम्हाला गरज पडणार नाही.. तर देव स्वतः तुमच्या दारात येईल एवढी ताकद आई वडिलांच्या भक्ती मध्ये आहे.

देव म्हणोनी तयानी,

दगडास पुजला ।

मात्या-पित्यास वाडीत टाकुनी,

स्वर्गास मुकला ।।

✍️आशु छाया प्रमोद (रावण)

अनमोल भेट

 एक अनमोल भेट

प्रेम

            या जगातील माझ्यासाठी सर्वात प्रिय असणारे अर्थात माझे आई वडील यांना काय भेट देऊ याचा विचार करत मी वाटेने चिंता ग्रस्त होऊन चालत होतो. त्याच वाटेत मला एक सत्वपुरूष मिळाले त्यांना माझ्या कपाळावरील पडलेल्या रेघांना बघून हे कळायला फार उशीर लागला नाही की, मी कसल्यातरी चिंतेत आहों. त्यांनी मला त्याचं क्षणी थांबवून विचारलं, “कसल्या विचारात आहेस बेटा तू?” मी त्या सत्वपुरुषांना उत्तर दिलो, “बाबा, मला माझ्या आई वडिलांना एक अनमोल भेट द्यायची आहे. परंतु, मला हे कळत नाही की, या जगात अशी कुठली अनमोल भेट आहे.” त्यावेळी त्यांनी एक क्षण ही विचार न करता मला बोलले की, या जगातील अनमोल भेट तर कोहिनूर हिरा आहे, देऊ शकतोस तू.....? यावर मी त्यांना हसून च उत्तर दिलो, “अहो बाबा, कोहिनूर हिरा तर फार दूर राहिला साधा हिरा सुद्धा द्यायची लायकी नाही आहे. आजही मी त्यांच्या पैशांवर आयुष्य जगत आहो. मग मला सांगा बाबा, मी माझ्या आई वडिलांना तेवढी महागडी भेट कशी देऊ शकतो.” यावर ते सत्वपुरुष मला म्हणाले, “मग बेटा, तू अनमोल भेट द्यायचं विसरून जा. मोठा हो पैसे कमव मग दे त्यांना एक अनमोल भेट. कारण या जगात पैशा शिवाय काहीही होऊ शकत नाही.” मी हे ऐकताच थोडा नाराज होऊन त्यांच्या जवळून जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात त्यांनी माझा हाथ धरला आणि म्हणाले, “बेटा थांब, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. मी म्हटलोय या जगात पैसा शिवाय काहीही होऊ शकत नाही, परंतु हे अर्धसत्य आहे.”

सत्वपुरूष

                 मी हे ऐकताच आश्चर्यचकित झालो आणि त्यांना विचारलो, “बाबा, हे पूर्ण सत्य नाही तर मग पूर्ण सत्य काय आहे....!” त्यावर ते बाबा मला सांगायला लागले, “पैसा शिवाय या जगात काहीही मिळत नाही, है जरी जगमान्य झालेलं असेल तरी देखील या जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या मिळवायला अरबो पैसा दिला तरी देखील मिळवू शकत नाही. फरक फक्त एवढंच आहे की, त्या गोष्टी आपल्याला सहजा सहजी दिसत नाहीत त्यासाठी आपल्याला आपला बघायचा दृष्टिकोन बदलावा लागेल.” त्यांना मी मध्येच थांबवून विचारलो, “ बाबा, मग हा आपला दृष्टीकोन कधी आणि कसा बदलेल?” त्यावर त्यांनी सांगितलं, “आपल्या डोळ्यांवर या जगाने एक अदृश्य चस्मा लावून ठेवलेला आहे त्यामुळे आपल्या ही तेच दिसते जे हे जग आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा असेल तर सर्वात आधी तो अदृश्य चस्मा आपल्या डोळ्यांवरून काढावा लागेल किव्वा Tarak Mehta ka ooltah chashma या serial मध्ये दाखविल्या प्रमाणे आपल्याला ही आपल्या डोळ्यांवरील चस्मा उलटा करावा लागेल. तेव्हाच आपला दृष्टीकोन बदलेल तेव्हाच आपल्याला या खी जगमान्य असलेल्या वाक्यांचा सत्य कळेल. तू तुझ्या आई वडिलांना देऊ शकतेस अशी एक अनमोल भेट आहे ते देखील तुझ्या जवळच ज्या भेट साठी तुला एक रुपया ही द्यावा लागणार नाही. फरक फक्त एवढाच आहे की, तुला ती दिसत नाही आहे कारण तुझ्या डोळ्यांवर देखील या जगाने घालून दिलेला तो अदृश्य चस्मा आहे म्हणून ते अनमोल भेट तुला दिसत नाही आहे.”

Tmkoc

                     हे ऐकताच मी अती उत्साहित होऊन त्यांना विचारलो, “सांगा ना बाबा ती अनमोल भेट काय आहे जी मी आपल्या आई वडिलांना देऊ शकतोय ती देखील एक ही रुपया न देता.” “होय, नक्कीच सांगतोय परंतु त्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.” असं त्यांनी म्हणताच मी लगेच त्यांना विचारायला सांगितलो. तेव्हा त्यांनी मला विचारलं, “तुला तुझ्या आई-वडिलांना च हे अनमोल भेट का द्यायची आहे? त्यांचं असं प्रश्न ऐकताच मी एका क्षणाचा देखील विचार न करता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरवात केलो, “कारण बाबा, मी या जगात सर्वात जास्त प्रेम फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांनाच करतो त्यामुळे मला सर्वात आधी त्यांनाच हे अनमोल भेट द्यायची आहे. त्यावर ते बोलले, “मग तू नकोच देऊ ते अनमोल भेट” असं म्हणताच की आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलो, “का? का बरं मी माझ्या आई वडिलांना अनमोल भेट नाही द्यायची?” त्यावर त्यांनी मला म्हटलं, कारण बेटा या जगातली सर्वात अनमोल भेट तर त्यांना देत च आहेस मग आणखी काय देणार?” मी परत आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलो, “मी कुठली त्यांना अनमोल भेट देलोय....!” त्यावर ते म्हणाले, “बेटा, या जगातील सर्वात अनमोल भेट हे प्रेम आहे आणि हे प्रेम अरबो पैसे देऊन सुद्धा विकत घेता येत नाही कारण ती एक अनमोल भेट आहे.” असं म्हणून त्यांनी परत मला म्हटलं, “तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मी निघू काय? कारण मला अजून खूप दूर जायचं आहे.” असं त्यांनी म्हणताच मी होकारार्थी मान हलवून त्यांना प्रमाण केलो. ते ही मला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले.


                                          मी आज पर्यंत तर हेच ऐकत आलो होतो की, या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम आहे पण आज कळलं या जगातील अनमोल भेट देखील प्रेम च आहे. वाटेत मिळालेल्या त्या सत्वपुरुषांनी म्हटलं ते योग्यच म्हटलं, पैशांनी प्रेम कधीच विकत घेता येत नाही. आणि मग शेवटी आपल्या आई वडिलांची सुद्धा आपल्याकडून कुठली महागडी वस्तू भेट द्यावी ही अपेक्षा मुळीच नसते तर त्यांना आपल्या कडून हवं असते ते फक्त आणि फक्त प्रेमाचे दोन शब्द तेवढं जर आपण त्यांना दिलं तर दुसऱ्या महागड्या भेट द्यायची मुळीच गरज पडत नाही. पण हल्ली परिस्थिती जरा वेगळी दिसत आहे. हल्लीची मुलं फक्त दिखाव्या साठी आई वडिलांना महागड्या भेटी देतात आणि जेव्हा त्यांना खरच त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा त्यांना लाथ मारून बाहेर हाकलून देतात. माझं सर्व मित्रांना हेच सांगणं आहे की, आपल्या आई वडिलांना तुम्ही महागड्या भेट वस्तू नाही देऊ शकले तरी हरकत नाही फक्त प्रेमाचे दोन शब्द रोज बोलत जा म्हणजे झालं. कारण या जगातील सर्वात अनमोल भेट जर कुठली असेल तर ते प्रेम आहे. हे प्रेम मिळविण्यासाठी कित्येक लोकं रडतात. लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा प्रेम विकत घेता येत नाही. अनमोल भेट कुठली असेल तर ते प्रेम आहे हिरे मोती नाही.


Conclusion:- 

                     पैश्या शिवाय काहीही होऊ शकत नाही असं सर्रास आपल्याला ऐकायला मिळत असेल पण हे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. पैशाने माणूस कधी आनंदी राहू शकत नाही. जीवनात जर आयुष्य आनंदमय पद्धतीने जगायचं असेल तर पैसा नाही दोन प्रेम करणारी माणसे हवीत......ती माणसे कधीच पैशाने विकत घेता येत नाही ते कमवावे लागतात....म्हणून तुमच्या आई-वडिलांना कधी महागडी भेट देऊ शकले नाही तर हरकत नाही पण रोज प्रेमाचे दोन शब्द बोलत चला तेच त्यांच्या साठी अनमोल भेट ठरेल कारण ती करोडो अरबो पैसे देऊन ही विकत घेता येत नाही.... 


आशु छाया प्रमोद

https://t.me/Chocholateboy5402