https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : marriage

Followers

Showing posts with label marriage. Show all posts
Showing posts with label marriage. Show all posts

Navara Baykoch Bhandan

 भांडण: एक धोक्याची घंटा

                                                जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे पती-पत्नी चं नातं आहे. कारण एकदा भाऊ आपल्याला सोडून जाईल बहीण सोडून जाईल Girlfriend/Boyfriend, Friends सर्व सोडून जातील एवढंच नाही तर आई वडील सुद्धा आयुष्यभर साथ देत नाहीत पण पती आणि पत्नी कधीच एकमेकांना साथ सोडत नाहीत. एक वेळ तर अशी येईल की, आपल्या पोटचा पोरगा सुध्दा आपल्याला सोडून जाईल पण पती पत्नी कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत. पती-पत्नी हे दोघे जणू आयुष्य नावाच्या गाडीचे दोन चाक आहेत. त्यामधील एक चाक जरी थोडा ही का होईल डगमगला तर आयुष्य नावाच्या गाडीची वाट चुकेल आणि आयुष्य संपेल. आणि या मागचं एकमेव कारण म्हणजे भांडण आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की, नात्यामध्ये भांडण होणं गरजेचं आहे. ज्या नात्यात भांडण होत नाहीत त्या नात्यामध्ये प्रेम नाही. परंतु हा च तुम्हा सर्वांचा गोड गैरसमज आहे. नात्यामध्ये छोटंसं जरी भांडण होत असेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.
                                    आज मी तुम्हाला एका मध्यमवर्गीय परिवाराची छोटीसी Story सांगतोय. पती चं नाव रवी आणि पत्नी चं नाव अंजली होतं. रवी हा Goverment Office मध्ये Job ला होता आणि अंजली Housewife होती. दोघांचं ही लग्न होऊन आज जवळपास 20 वर्षे झाली होती त्यांना एक 17 ते 18 वर्षाचा मुलगा(राहुल) सुद्धा होता. आता तुम्हाला वाटत असेल की, है तिघेही गुण्या-गोविंदाने राहत असणार. तर तुम्ही चुकीचे आहात हे तिघेही कधीच गुण्या-गोविंदाने राहिले नाही कारण रवी आणि अंजली मध्ये क्षुल्लक कारणांवरून छोटं मोठं भांडण नेहमीच होत राहायचं. कधी रवी ला Office मध्ये उशीर व्हायचा तर अंजली त्याच्यावर ओरडायची तर कधी रवी Office मधून लवकर आला आणि अंजली त्याला घरात दिसली नाही तर रवी अंजलीवर ओरडायचा. कधी Market मधून वांगे आणले आणि आलू नाही आणले म्हणून भांडण व्हायचं तर कधी Market मधुन Fish आणलं Chicken नाही आणलं म्हणुन भांडण व्हायचं. कधी रवी अंजलीच्या Relative's मध्ये जात नाही म्हणून भांडण व्हायचं तर कधी अंजली रवीच्या Relative's चा मान ठेवत नाही म्हणून भांडण व्हायचं. रवी आणि अंजली ने ही सततची भांडणं होण्यामागची कारणं जाणून घेण्यासाठी मोठ्यांशी सल्लामसलत केलं परंतु त्यांनीही हेच सांगितलं की, “पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं होणं स्वाभाविक आहे. याबद्दल तुम्ही फार विचार करू नका हे तुमच्या दोघांमधलं प्रेम च आहे.” असं त्यांनी सांगितलं म्हणून दोघेही निवांत झाले परंतू त्यांच्या याच छोट्या मोठ्या भांडणाचा प्रभाव मात्र हळू हळू त्यांचा मुलगा राहुल वर व्हायला लागला याचा त्यांना जराही भान न्हवता. एक दिवस ये सर्व त्याच्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आणि त्याने स्वतःच्याच Room मध्ये Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Sucide Note मध्ये लिहून ठेवलं, “आई-बाबांच्या सततच्या भांडणाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहो.” 
                           मुलाचा Sucide Note वाचून दोघांचेही डोळे तर खुलले होते मात्र परिस्थिती अजूनही सुधारलेली न्हवती. त्या दोघांमधले होणारे सतत ची भांडणे आता वाढू लागली. परंतु मुलगा गेल्यामुळे दोघांनाही आया त्यांच्या एकटेपणा त्यांना छळू लागला होता. रवी office मध्ये काम करत असल्यामुळे का होईना त्याला फारसा फरक जाणवत न्हवता परंतु अजली मात्र घरात एकटी पडल्यामुळे तिला तिचा एकटेपणा अती छळू लागलेला होता. तिला घरात नेहमीच तिच्या मुलाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या, तिच्या डोळ्यासमोर सारखा राहुल चा फाशी लागलेला चेहरादिसत होता. आणि तिनेही ऐक दिवस ज्या Fan ला राहुलने फाशी लावून आत्महत्या केली होती त्याच Fan ला अंजली ने देखील स्वतःला फाशी लावून आत्महत्या केली होती. आणि Suside Note वर तिने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल च्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.” आता मात्र रवी चा Office मध्ये देखील मन लागायचा नाही. त्याच्या डोळ्यासमोर सारखं अंजली आणि राहुल चा फाशी लागलेला चेहरा दिसत होता आणि कानावर दोघांच्याही किंचाळ्या ऐकायला यायच्या. त्याला घरात सुद्धा जावसं वाटत न्हवतं म्हणून त्यानेही एक दिवस Office मधल्याच एका Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Suside मध्ये त्याने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल आणि माझी पत्नी अंजली या दोघांच्याही आत्महत्येला कारणीभूत आहे म्हणून मी आत्महत्या करतोय. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरवू नये.” एका छोट्याशा भांडणामुळे घरातील तिघांनीही आत्महत्या केली आणि त्यांचं अख्खं आयुष्य संपलं.
                             रवी आणि अंजली यांची story वाचून तर तुम्हाला कळलंच असेल की एक छोटंसं ही भांडण कसं अख्ख्या परिवाराच्या आयुष्याची राख-रांगोळी करू शकते. आपला हा खूप गोड गैरसमज आहे की पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही त्यांच्यामधील असणाऱ्या प्रेमामुळे होतात. वास्तविकरीत्या पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही एकमेकांना समजून न घेतल्या मुळे होत असतात. कारण लग्न जुळवतांनी आपण सर्व बघतो मात्र कधीच हे बघत नाही की मुलगा मुलगी एकमेकांना समजून घेऊ शकतात की नाही. मी माझ्या मागील blog (A social gamble एक समाजमान्य जुगार: लग्न) यामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलो की लग्न ठरवतांना मुलगा आणि मुलगी यांना हवा तेवढा वेळ द्या जेणे करून हे एकमेकांना समजू शकतील. कारण जर मुलगा मुलगी एकमेकांना समजू शकले नाहीत तर त्यांच्या मध्ये देखील रवी आणि अंजली सारखे भांडणं होतील आणि अख्ख्या परिवाराचं आयुष्य बरबाद होईल.

Conclusion:- 

                       पती-पत्नी च्या नात्यामध्ये भांडणं होत असतील तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे...कारण एक छोटंसं ही भांडण देखील विशाल रूप घेऊन अख्खं आयुष्य बरबाद करू शकते.

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

A social gamble एक समाजमान्य जुगार

जुगार




Jugar

                        तुम्हाला मला आणि आपल्यातल्या प्रत्येकच तरुणांना लहानपणा पासून आपले पालक एक गोष्ट सांगत असतात. ती अशी की बेटा, आयुष्यात कधीच जुगार खेळू नकोस. त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे. माझा त्यांच्या या गोष्टीला मुळीच विरोध नाही. आयुष्यात कधीच खेळ म्हणून अथवा Just एक Timepass म्हणून देखील जुगार खेळू नये. कारण, Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती सुद्धा परत जुगार नक्की खेळेल यात काडी मात्र शंका नाही. एकदा फक्त Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती जर का हरला तर तो जिंकण्याच्या उमेदीने परत नक्कीच खेळणार आणि जर का तो जिंकला तर आणखी जिंकण्याच्या लालच मुळे तो परत नक्कीच खेळेल आणि हाच त्याच्या Timepaas एक दिवस त्याची सवय होऊन जाईल. आणि सवय ही वाईट गोष्टींची असो वा चांगल्या गोष्टींची ती कायम वाईट च असते. हे सगळं तर तुम्हाला तुमच्या पालकांनी सांगितलं च असेल वा तुम्ही कुठंतरी नक्कीच वाचलं असेल. यात काही नवीन नाही आहे पण आता मी जे सांगणार आहे ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. जे आई वडील किव्वा जे पालक आपल्याला लहानपणा पासून सांगत आलीत की, बेटा जुगार खेळू नकोस. तेच आई वडील स्वतःच, स्वखुशीने आपल्याला जुगार खेळायला बसवतात जुगार खेळायला लावतात. आता तुम्ही विचार कराल की, “हे कसं काय शक्य आहे? माझ्या तर आई वडिलांनी कधीच मला जुगार खेळायला लावलं नाही....” तर हेच मी या Blog Post मध्ये सांगायला आलोय.
                       मुलगी 21 वर्षाची झाली आणि मुलाला नोकरी मिळाली किव्वा तो थोडाफार कमवायला लागला की त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट आपोआप Add होऊन जाते ती म्हणजे लग्न....! मुलगा नोकरी ला किव्वा काही थोडे फार पैसे कमवायला लागेपर्यंत त्यांचे आई वडील थकायला लागतात त्यांच्यासाठी घरी हाथभार लावायला कुणीतरी सोबत हवी म्हणून मुलगा कमवायला लागल्यावर लग्न करणे साहजिकच आहे यात काही शंका नाही. तसेच मुलगी ही कधीच आपल्या आई वडिलांना बोझ राहत नाही परंतु तिला वयात आल्या नंतर घरात एकटं ठेवणं बरं दिसत नाही म्हणून तिचाही लग्न करणे साहजिकच आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता हे लग्न नाही तर एक समाजमान्य जुगार च आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. लग्न हा एक समाजमान्य जुगार आहे.....! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पवित्र अशा लग्नाला जुगाराचं नाव का देतोय? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही मी देतोय.....

एक समाजमान्य जुगार: लग्न

Marriage
                                जुगार खेळणाऱ्याला नशीबाने साथ दिली तर रस्त्यावर राहणारा देखील मोठा बंगला बनवू शकतो आणि जर का जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला नशीबाने साथ दिली नाही तर एका बंगल्यात राहणारा देखील रस्त्यावर येतो. अगदी तसच लग्नाचं ही झालं आहे. Partner योग्य मिळाला तर एका झोपडी मध्ये देखील स्वर्ग असल्यासारखं वाटेल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्या मध्ये सुद्धा नरक यातना सहन कराव्या लागतील. पण हे तर नशीबावर अवलंबून आहे यात आपण माणसे काय करू शकतो? यात आई वडिलांची कुठं चुकी आहे? असं तुम्हाला वाटत असेल. तर होय तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हे नशीबावर अवलंबून आहे. पण जर का आपण लग्न ठरविण्याच्या पद्धतीवर अगदी बारकाईने लक्ष दिलं तर कळेल की मी लग्नाला जुगार का म्हटलोय...
                            अख्खं आयुष्य जातं एका माणसाला ओळखण्यात आणि हे 1 तासाच्या Meeting मध्ये ठरवतात की लग्नासाठी मुलगा/मुलगी योग्य आहे की नाही. कित्येकदा तर मुलीला विचारलं देखील जात नाही की तिला तो मुलगा आवडतो की नाही. अरे आयुष्यभर त्या मुलीला राहायचं आहे ना त्या मुलासोबत मग एकदा तिला विचारा ना.....माझ्याच वर्गातील एका मुलीचा लग्न तिच्या वडिलांनी तिच्याच आत्याच्या मुला सोबत ठरवलं...का तर म्हणे मुलगा चांगला नौकरी वर आहे. अरे लग्न त्या मुलासोबत लावायचं आहे की त्याच्या नौकरी सोबत...त्या मुलीच्या डोळ्यात च दिसते की तिला तो मुलगा मुळीच आवडत नाही हे तिच्या वडिलांना दिसत नसेल का? दिसत ही असेल कदाचित पण प्रत्येक आई वडिलांना जसा विश्वास आहे की ते त्यांच्या मुलांचं/मुलींचं वाईट होऊ देणार नाही अगदी तसाच तिच्याही वडिलांना विश्वास आहे पण हा विश्वास जरा अती होत चाललाय...आणि ते म्हणतात ना “अती तिथं माती” तसाच हा अती विश्वास देखील मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलगा चांगला दिसला की मुलीचं लग्न ठरवून टाकतात आणि मुलगी चांगली दिसली की मुलाचं ही लग्न ठरवून टाकतात त्या 1 तासाच्या Meeting मध्ये आणि मग नंतर 1 महिन्यात साखरपुडा आणि दोन महिन्यात लग्न करतात....मग त्यांच्या मध्ये पटलं नाही किव्वा काही वर्षाने तलाक झालं तर नशीबाला दोष देऊन मोकळे होतात. मला आता सांगा यात नशीबाचा काय दोष? आपण एक साधा Shirt देखील घेण्यासाठी जेव्हा shop मध्ये जातो तेव्हा कित्ती वेळ विचार करतो... Shirt हा Jeans वर शोभेल का? त्यांचा रंग आपल्यावर शूट होईल का? shirt ची Quality कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो Shirt आपल्या Budget मध्ये बसेल का? एवढा विचार करतो तो फक्त एक Shirt घेण्यासाठी मग हा तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे विचार करायला नको.. 1 तासाच्या Meeting मध्ये Partner दिसायला चांगलं वाटलं किव्वा चांगली नोकरी आहे तर लग्न लावून द्यायचं. मग हा जुगार नाही तर काय आहे? Partner योग्य मिळाला तर एका झोपडीचं देखील स्वर्ग होईल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्याचं देखील नर्क व्हायला उशीर लागणार नाही...

Conclusion:-

                       माझा लग्नाला मुळीच विरोध नाही. मला हे देखील मान्य आहे की, आई वडील कधीच मुलांचं वाईट सोचनार नाही पण तो आधी सारखा जमाना आता राहिलेला नाही. इथे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. लग्न हा त्या मुला-मुलीचा आयुष्यभऱ्याचा प्रश्न असतो त्यासाठी ती 1 तासाची Meeting पुरेशी नाही आहे. त्या मुला-मुलीला हवा तेवढा वेळ घेऊ द्या, त्यांना एकमेकांना समजून घेऊ द्या आणि नंतर च लग्न ठरवा. कारण हल्ली कित्येक लग्न तुटून राहिलेत त्याचा सर्वात महत्वाचा कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे हाच आहे.

Important Note:-

                             मी इथे Arrange Marriage बद्दल Problem Share केलो याचा अर्थ असं नाही की माझा Love Marriage ला पूर्ण समर्थन असेल. मुलं-मुली लग्नाच्या वयात आले म्हणजे असं नाही की ते त्यांचा Life Partner स्वतः निवडू शकतात. तुम्हाला Love Marriage करायचं असेल तर करा पण आई वडील किव्वा मोठ्यांच्या सल्ला घेऊन च समोरचं योग्य तो Decision घ्या..शेवटी लग्न हा आयुष्यभऱ्याचा प्रश्न आहे......

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद