https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : September 2022

Followers

Durga Navratri 2022

 नवरात्री  

                              हिंदू धर्मात देवी भागवत पुराणानुसार वर्षभरात मुख्यतः चार नवरात्री असतात ज्यात दोन गुप्त नवरात्री ज्या तांत्रिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात आणि दोन चैत्र नवरात्री ज्या मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणासाठी साजऱ्या केल्या जातात. आता चैत्र नवरात्री मध्ये एक वासंतिक नवरात्र असते जी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः मार्च ते एप्रिल मध्ये असते. आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री जी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते म्हणजे साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये साजरी केली जाते. तर आता आज पासून शारदीय नवरात्र सुरू झाल्यामुळे मी आज तुम्हाला शारदीय नवरात्र बद्दल सांगतोय.

शारदीय नवरात्र:-

                        शारदीय नवरात्र ला शाक्तपंथीय मानले जाते. ही शरद ऋतूच्या सुरवातीला येत असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या काळात घट स्थापन करून नव दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते म्हणूनच या शारदीय नवरात्री ला घटस्थापना किव्वा नवरात्रोत्सव असे देखील म्हणतात. या दुर्गा देवीचे नऊ रूप सौम्य आणि उग्र अशा दोन रुपात वर्गीकरण केलेली आहे. सौम्य रुपात उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी तर उग्र रूपात काली, चंडी, भैरवी, चामुंडा अशी आहेत. 

               प्रथमंशैलपुत्रीति, द्वितीयंब्रह्मचारिणी ।

               तृतीयंचन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।।

               पंचमंस्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

               सप्तमंकालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम्।।

             नवमं सिद्धिदांप्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

             उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। 

                            अर्थात प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चतुर्थ कुष्मांडी, पंचमी स्कंदमाता, षष्टी कात्यायनी, सप्तमी कालरात्री, अष्टमी महागौरी आणि शेवटी नवमी सिद्धिदात्री अशी मुख्य दुर्गा देवीचे नऊ रूप आहेत. या नऊ रात्रीच्या नऊ दिवशी स्त्रिया वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या घालून नऊ देवींच्या रुपाची आराधना करतात जसं की 2022 च्या तारीख आणि वार नुसार पहिल्या दिवशी पांढरी, दुसऱ्या दिवशी लाल, तिसऱ्या दिवशी निळी, चौथ्या दिवशी पिवळी, पाचव्या दिवशी हिरवी, सहाव्या दिवशी ग्रे, सातच्या दिवशी भगवी, आठव्या दिवशी मोरपंखी आणि शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी गुलाबी रंगाची साडी घालून नवरात्री साजरी केली जाते ही पेशवाई पद्धत आहे. 

       पौराणिक कथा नुसार अशी मान्यता आहे की, एका महिषासुर नावाच्या दैत्याने अनेक वरदान घेऊन देवतांना छळत होता त्यामुळे सर्व देवता शिव, विष्णू आणि ब्रम्हा कडे आले आणि त्यांनी एका देवी ला प्रकट करून तिला शस्त्र-अस्त्र देऊन तिला महिषासुर चा वध करायला पाठविले. हा युद्ध नऊ दिवस चालला होता आणि शेवटी दहाव्या दिवशी महिषासुर चा त्या देवीने वध केलं. या संबधित अशी देखील मान्यता आहे की, सर्व देवतांनी नऊ दिवस त्या देवीची आराधना करून तिला शक्ती प्रदान केली. त्या नऊ दिवसांना स्मरणात ठेवण्यासाठी नऊ दिवसाची नवरात्री साजरी केली जाते. परंतू या सर्व मान्यता आहेत ज्यांचा आधार पौराणिक कथा आहेत. ज्याच्यावर काही लोकांचा विश्वास आहे तर काहींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात. मात्र हा ज्यांच्या त्यांच्या वयक्तिक विषय आहे यात माझा मुलीच विरोध नाही. ज्यांचा विश्वास आहे ते मानतात ज्यांचा विश्वास नाही ते मानत नाहीत. या नवरात्रीचा चा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे..

वैज्ञानिक दृष्टिकोन:-

                         आपले आधीचे पूर्वज ऋतू नुसार सणवार साजरे करायचे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सण मध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असायचा. नवरात्री ही साधारणतः ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असते ज्यात संक्रमक रोग होण्याची दाट शक्यता असते तसेच ऋतू मध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते. त्यामुळे सात्विक भोजण केलं पाहिजे. ज्याने त्याचा पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ करते. तसेच नऊ दिवस व्रत, उपासना, ध्यान केल्याने मनाची शांती सुद्धा मिळते. Times of India च्या report नुसार खाद्य पदार्थ चा प्रकृती वर होणाऱ्या परिणाम नुसार त्यांनी खाद्य पदार्थांना राजसिक भोजन, तामसिक भोजन आणि सात्विक भोजन मध्ये विभाजित केलं. राजसिक व तामसिक भोजन हा प्रकृती साठी हानिकारक ठरतो आणि सात्विक भोजन केल्याने पाचन तंत्र सुधारतो आणि शरीरातील अशुद्धी साफ होते. म्हणुन नवरात्री मध्ये व्रत उपासना ध्यान करून सात्विक भोजन केलं पाहिजे ज्याने या काळात होणारे संक्रमिक रोग आपल्याला होणार नाही...

                            या मागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे याच काळात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्याविषयी स्त्रियांचा आदर सत्कार म्हणून देखील हा नवरात्री चा उत्सव साजरा केला जातो. चला तर मग अंधश्रद्धा विसरून हा सण साजरा करूया....

conclusion:-

                      मी या लेख द्वारे तुम्हाला नवरात्र चे धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो. कारण कित्येक लोकं याला अंधश्रद्धा समजून कानाडोळा करतात व काहीही खातात मात्र या काळात काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे हाच माझा उद्देश आहे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..


धन्यवाद....

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद

How to determine Good Writing in 2022? and Why read?

 लेखकाचा वाचक आणि वाचनाशी संबंध...

            तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? एका लेखकाचा वाचन आणि वाचक यांच्याशी थेट संबंध असतो. कारण एक लेखक हा वाचनाशिवाय कधीच लिहू शकत नाही आणि वाचकाशिवाय लेखकांच्या लिखाणाला कधीच अर्थ लागणार नाही. म्हणुन मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लेखकाने वाचन आणि वाचकांना कधीच विसरू नये. कारण वाचकांमुळे फक्त लेखकाच्या लेखनाला अर्थ च लागत नाही तर त्यांच्या प्रत्येक्ष किव्वा अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमुळे लेखकाला प्रेरणा देखील मिळत असते. आज मी अशाच एका वाचक बद्दल लिहीत आहों ज्या स्वतः सुद्धा एक उत्तम लेखिका/कवीयित्री आहेत. माझ्यापेक्षा त्या कदाचीत 1 ते 2 वर्षाने जरी लहान असतील मात्र विचारांनी माझ्यापेक्षा देखील फार मोठ्या आहेत असं मला वाटते. त्यांचं नाव “वैष्णवी संतोष खलसे” असं आहे. त्यांचा मी फार फार आभारी आहो. कारण त्यांनी माझ्या प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देऊन मला वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यासाठी एक प्रकारे प्रेरीतच केलं आहे. त्यामुळे आजचा हा लेख त्यांनीच विचारलेल्या एका प्रश्नावर आहे.

त्यांचा आवडला कॅरेक्टर मोटू
                   एके दिवशी वैष्णवी मॅडम नी मला विचारलं की सर, “आपण नेहमी म्हणतो की चांगलं लिखाण वाचलं पाहिजे, चांगलं लिखाण वाचलं पाहिजे तर मग चांगलं लिखाण आपण कसं निवडायचं? आणि वाचन का करावं? किव्वा कशासाठी करावं?” मी फार मोठा लेखक नाही परंतु मला वयक्तिकरित्या असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते, लिखाण हे लिखाण असते मात्र त्यातून आपण चांगलं काय घेतो आणि वाईट काय घेतो यावर अवलंबून असते.  आता उदाहरणार्थ बघितलं तर, आपल्याकडे असे कित्येक पुस्तके किव्वा लेख आढळतील ज्यात भाकड (विश्वास न करता येणारे) कथा आहेत ज्यांच्या आधारे समाजाची दिशाभूल केली जाते. परंतु आपण ते कुणाच्यातरी सांगण्यावरून वाईट आहे म्हणून वाचणारच नाही तर आपल्याला त्यावर विचार करता येईल का? आणि जर आपण त्यावर विचार च केला नाही तर ते लिखाण किव्वा पुस्तक कुठं वाईट आहे हे कळेल का? आणि आपल्याला त्यात काय वाईट आहे हेच कळणार नाही तर आपल्याला चांगलं काय आहे हे देखील कळणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटते की, लिखाण हे कधीच चांगलं किव्वा वाईट नसते तर त्यातल्या काही बाबी चांगल्या किव्वा वाईट असतात. ते आपल्याला फक्त वाचून नाही तर चांगला विचार करून ठरवायच्या असतात की त्यात काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, आपण वाचन का करावे? किव्वा कशासाठी वाचन करावे? तर याचं एकच उत्तर आहे. वाचनाने माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि एकदा विचार करण्याची क्षमता वाढली की त्या व्यक्तीला चांगलं लिखाण कोणतं? आणि वाईट लिखाण कोणतं हे निवडण्याची गरज भासणार नाही. तर वाईट मधून सुद्धा चांगलं आत्मसात करायची कला अवगत होते.  

              मी वर सांगितल्या प्रमाणे फार मोठा लेखक नाही परंतू मी माझ्या परीने उत्तर देण्याचं प्रयत्न केलो. एक लेखक म्हणून माझ्या वाचकांप्रती ही माझी जबाबदारी आहे की, मी माझ्या वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तसेच मी माझ्या सर्व वाचकांना हे सांगतोय की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटते किव्वा मला जे काही विचारावं वाटते ते नक्की विचारा. मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. परत एकदा मी “वैष्णवी संतोष खलसे” तसेच इतर वाचकांचा फार फार आभारी आहो कारण तुम्हीच मला एवढं मोठं केलं आहे.

धन्यवाद... 

तुमचाच लाडका

आशु छाया प्रमोद(रावण)

7820994148

Who is the Ambedkarwadi? खरा आंबेडकरवादी कोण?

 आंबेडकर साऱ्यांचा बाप आहे.....

Do. Babasaheb Ambedkar 
                                      प्रस्तुत लेख लिहिण्यापूर्वी मी प्रथमतः परम् पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. कारण त्यांच्यामुळेच आज माझ्या हातात लेखणी आहे आणि तसेच लिहिण्याचं, एखाद्या विषयावर आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देखील मिळालं आहे. माझे एक मित्र विद्रोही कवी/लेखक रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक फार चांगली कविता लिहिली. ती कविता मला पटली नाही अशातला भाग मुळीच नाही तर ती कविता मला फार आवडली. परंतू ते म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात अगदी त्याच प्रमाणे प्रत्येकच गोष्टीच्या दोन बाजू असतात. कवितेची तीच दुसरी बाजू स्पष्ट करण्यासाठी मी प्रस्तुत लेखक लिहीत आहो. 

                      ती म्हणाली,

                      आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे

                      आणि मी इथच तिच्या प्रेमात पडलो.......

                                         अगदी खरं आहे मिर्झा, आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे यात काडी मात्र शंका नाही. मात्र आपण 'आंबेडकर साऱ्यांच्याच बाप आहे.' असं ऐकून ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो ती व्यक्ती खरचं आंबेडकरवादी आहे का? की ती व्यक्ती देखील आपलं काम काढून घेण्यासाठी आम्हाला भावनिक करण्याच्या प्रयत्न करत आहे. यात मात्र मला नक्कीच शंका आहे. कारण एक दिवस कुणीतरी येऊन भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपल्याकडून च नारेबाजी करून मत मागतो. आणि आपण सुद्धा याने बाबासाहेबांचं नाव घेतला म्हणजे तो आंबेडकरवादी च असेल असं समजून भावनेच्या भरात त्याला निवडून देतो. आमच्या भरोशावर तो निवडून येतो आणि घरी बसून खातो परंतु आपण मात्र फक्त नारेबाजी करत राहतो. कारण त्याने डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतलं असतं म्हणून आपण त्याला डोक्यावर चढवलो परंतू तो आंबेडकरवादी आहे किव्वा नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. Tik Tok वर एक मुलगा एक व्हिडिओ बनवतो त्यात तो पांढरे कपडे घालून एका पांढरी साडी घालणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला विहारात जातो आणि background मध्ये एक गाणं असतो, पांढरे कपडे घालून बुद्ध पूजेला बसावं आपण त्यालाही Viral करतो. मात्र त्याने त्याच्या डाव्या पायात घातलेला काळा धागा मात्र कुणालाही दिसत नाही जो धनलाभ होण्यासाठी तो घातलेला असतो कारण आम्ही बाबासाहेब किव्वा बुद्धांचं नाव घेतलं की आपण त्याला डोक्यावर घेतो मात्र बुद्ध धर्मात मूर्ती पूजा किव्वा अंधश्रध्देला स्थान नाही याचा विचार मात्र आपण करू शकत नाही. असच एकदा कुणालातरी म्हटलं होतं की, मूर्ती पूजा करू नये तर तो म्हणाला की, मग आम्ही मुर्त्या फोडायच्या का? कित्ती लाजिरवाणी गोष्ट आहे, आम्हाला मुर्त्या, पुतळे, स्मारके का तयार केलेली आहेत ते देखील माहिती नाही. मुर्त्या, पुतळे किव्वा स्मारके हे पुढच्या पिढीला खरा इतिहास सांगण्यासाठी कामात येणार आहेत. अन्यथा समोरच्या पिढीला काल्पनिक कथा सांगून खरा इतिहास गहाड केला जाईल. मी मूर्ती पूजा करू नका म्हटलो मात्र याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मुर्त्या पुतळे किव्वा स्मारके फोडा. परंतु आपण या सर्व गोष्टीचा कधीच विचार करू शकत नाहीत कारण आपण आपली विचार करण्याची क्षमता च गमावून बसलो आहोत. म्हणुन आपल्याजवळ कुणीही येऊन डॉ. बाबासाहेबांचं नाव घेतो आणि आपल्याला भावनिक करून आपलं स्वार्थाचं काम करून निघून जातो. ही परिस्थिती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीच संबंधित नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीही संबंधित आहे. १९ फेब्रुवारी आली की कॉलेज च्या कट्टयावर बसून मुलींची थट्टा करणारे कित्येक तरुण मुलं शिवरायांसारखी दाढी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून बाहेर पडतात. हातात भगवे झेंडे धरून गावभर फिरतात मात्र शिवरायांच्या एकाही विचारांवर ती मुलं चालतांनी दिसत नाहीत. फक्त १९ फेब्रुवारी आली की यांच्या अंगात शिवराय संचारतात. अशाच शिवभक्तांचा राजकारणी सर्रास वापर करून घेतात.

Chhatrapati Shivaji Maharaj 
                                आपल्या जवळ कुणीही येऊन शिवरायांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो आणि आपण त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. मात्र ते खरचं त्यांच्या विचारांवर चालतात किव्वा नाही याचा विचार मात्र करीत नाही. यांच्या जयंत्या आल्या की DJ लावून नाचण्यात एवढे गुंग झालो की आपला वाचनाकडे दुर्लक्ष झाला आणि हेच कारण आहे की आपण विचार करण्याची क्षमता गमावून बसलो. आज बघायला गेलं तर एका छोट्याशा गावात देखील १० ते २० हजार किंबहुना त्यापेक्षाही अधिक रुपये आपण दरवर्षी या जयंत्या मध्ये DJ वर नाचण्यात खर्च करतो. परंतु आज किती गावात किती ग्रंथालयं आहेत आणि त्या ग्रंथालयांमध्ये शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे किती पुस्तके आहेत याकडे लक्ष घालत नाही. त्यांच्या जयंत्यामध्ये एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जे तेच पैसे त्या ग्रंथालयासाठी खर्च केले तर ०४ ते ०५ वर्षात चांगलं ग्रंथालय प्रत्येक गावात स्थापन होतील आणि प्रत्येक लोकांना शिवरायांचे, डॉ.बाबासाहेबांचे तसेच इतर थोर पुरुषांचे विचार वाचायला मिळतील. आणि मला नाही वाटत या थोर पुरुषांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी यापेक्षा चांगला कुठला मार्ग असेल!

Conclusion:-

                      मला एवढंच म्हणायचं आहे की, कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बाबासाहेबांचं नाव घेणारं किव्वा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारं खरचं त्यांच्या विचाराचं आहेत का? याचा विचार करून नंतरच विश्वास ठेवा. तसेच जयंती आली की DJ लावून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा हीच खरी जयंती आहे.

                 प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी मला तुझ्या कवितेवर आपले विचार व्यक्त करायला मला परवानगी दिल्याबद्दल रोहित शिवाजीराव पेटारे उर्फ मिर्झा भाई तुझे खूप खूप आभार! माझ्याकडुन नकळत पणे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कर तसेच माझ्यामुळे नकळत पणे कुठल्याही समाजातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो. माझा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा न्हवता. काही चुकलं असेल किव्वा काही सुटलं असेल तर कमेंट द्वारे मला नक्कीच मार्गदर्शन करा मी तुमच्यापेक्षा फार काही मोठा नाही मी एक विद्यार्थी च आहों. मला जे काही वाटलं ते मी तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केलो.


धन्यवाद....

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद

मु.पोस्ट:- उमरी/लवारी 

ता. साकोली, जिल्हा:- भंडारा

Character less रांड

 रांड 

           आज मी एका अशा विषयावर लिहीत आहों जे वाचून कदाचित काही मुलांना माझा राग येईल. काही मुलं मला शिव्या पण देतील. पण मी लिहिणार कारण ते सत्य आहे. मी मुलगा झालो म्हणून काय झालं जे चुकीचं आहे त्याला माझा कायम विरोध राहील मग समोर कुणीही असो. एखादी मुलगी आपल्यासोबत relation मध्ये असेल आपल्यासोबत physical झाली असेल आणि नंतर ब्रेकअप झालं असेल. तीच मुलगी जर कधी दुसऱ्या कुठल्या bf ला date करतांनी दिसली की आपण तिला सर्रास रांड म्हणतो. ठिक आहे जर ती तुमच्या दृष्टीने रांड असेल तर ठीक आहे ना पण ती तुमची gf असायच्या आधी तुमच्या 3-4 gf होत्या त्यांचं काय? किव्वा तिच्या सोबत relation सुरू असतांना सुद्धा तू दुसऱ्या मुली सोबत physical झाला त्याचं काय? किव्वा ती सोडून गेल्यानंतर तू सुद्धा दुसरी मुलगी बघितलासच त्याचं काय? तिने दुसरा bf बनवला म्हणून जर ती रांड झाली तर तुझ्या तर कित्येक gf झाल्यात मग तुला काय म्हणायचं? 

            मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगतो तिचं नाव मी सांगत नाही पण ती माझी सिनियर होती. तिला सर्वच मुलं रांड म्हणत होते. म्हणून मी सहज एका मुलाला विचारलो की, या मुलीला रांड का म्हणतात? तर त्याने मला सांगितलं की, ही या मुलीचे खूप bf झालेत आणि ही मुलगी नेहमी BF बदलत असते. त्या मुलीच्या गावचे माझे खूप मित्र मैत्रीण होते त्यांच्या साहाय्याने मी तिची माहिती जाणून घेतलो आणि हे सर्व ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला....! कारण एवढी साधी सरळ मुलगी आज प्रत्येक मुलाच्या नजरेत रांड कशी ठरली? असा मला प्रश्न पडू लागला. मी हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी as a ज्युनियर स्टूडेंट म्हणून contact वाढवलो आणि तिच्याशी एकदिवस मैत्री केलो. तेव्हा तिच्याकडून च मला तिचा पहिला bf कोण होता हे कळलं आणि योगानुयोग च जणू तिचा पहिला bf माझ्या च जवळचा व्यक्ती होता. मी तिला नंतर याबद्दल म्हटलो की, हे तू चुकीचं करत आहे हे लवकरात लवकर थांबव. आणि तिच्या त्या पहिल्या bf ला पण त्यांच्या relation बद्दल विचारलो तेव्हा मला कळलं की तिचं प्रॉब्लेम काय आहे. 

           तिच्या पहिल्या bf ने तिच्याशी फक्त Physical होण्यासाठी प्रपोज केलं आणि ते नंतर थोड्याच दिवसाने Physical सुद्धा झाले एकदा नाही तर अनेकदा physical झाले. आणि हेच नेहमी नेहमी physical झाल्यामुळे तिला सवय झाली पण काही दिवसांनी हे प्रकरण त्या मुलीच्या घरी कळलं आणि त्याचं relation break झालं. नंतर तिला दुसरा bf मिळाला त्यानेही फक्त Physical होण्यासाठी relation ठेवलं आणि काही दिवसाने ब्रेकअप केलं असेच तिला bf भेटत गेले त्यामुळे तिला जणू ही सवय च झाली. bf बनवायचं त्याच्याशी physical व्हायचं आणि 1-2 महिन्याने ब्रेकअप करायचं. आता मला सांगा ती तर एक साधी सरळ मुलगी होती मग ति रांड कशामुळे झाली? जर ती 10 bf बदलवत असेल आणि मुलांशी physical होत असेल तर मुलांच्याही कित्येक gf असतातच आणि तेही ही कित्येक मुलींशी physical होतात त्यामुळें तिला रांड म्हणायचा तुमचा अधिकार नाही. मी असं म्हणत नाही की प्रेमात Physical होऊ नका. पण Physically Attract होऊन physical होऊ नका.

                 एखादी व्यक्ती आपल्या पार्टनर सोबत Physically Attraction द्वारे जर phycical होत असेल तर त्यांच्या मधलं प्रेम कमी होत जाते. सरळ भाषेत सांगायचं झालं तर नेहमी नेहमी एकाच पार्टनर सोबत Physical होऊन ते बोअर होतात. हे मी नाही म्हणत तर it's a psychological fact. त्यामुळे हल्ली तरुण किव्वा तरुणींचं bf/gf बदलणं हे स्वाभाविक आहे. मला मान्य आहे हे चुकीचं आहे पण याचं कारण ही आपला समाज आहे जो कधी sex बद्दल मनमोकळे पणाने बोललं जात नाही. आणि आपण मुले सुद्धा कधी मोठ्यांना विचारत नाहीत. आपण आपल्या मित्र वा मैत्रिणींना विचारतो त्यांना असलेलं अर्धवट ज्ञान ते तुम्हाला सांगतात. आणि अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते. आणि आपण अशा चुका करून बसतो ज्या खरच चुका आहेत तुमचा मनोरंजन हे ही तुम्हाला कळत नाही तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून करता. मी पुन्हा सांगतो physical होणं चुकीचं नाही फक्त तुमची पद्धत चुकीची आहे त्याबद्दल जाणून घ्या sex बद्दल पूर्ण जाणून घ्या. शक्यतो मोठ्यांना विचारा. पण अर्धवट ज्ञान असणाऱ्या किव्वा अशा मित्रांना किव्वा मैत्रिणींना विचारू नका जे फक्त मनोरंजन म्हणून sex करतात. Sex education is most important in our life.

            माझं पुन्हा एकदा मुलांना सांगणं आहे की अशा मुलींना कृपया रांड म्हणून त्यांची बदनामी करू नका तुमच्याही घरी आई आहे बहीण आहे याचा भान असूद्या. तुमच्या बहिणीला सुद्धा मी रांड म्हटलो किव्वा एक रात्र झोपायला माझ्या घरी पाठवा म्हटलो तर मग तुम्हाला ही राग यायला नको पाहिजे याचाही विचार करून ठेवा. ती जर रांड असेल तर तिला रांड बनवणारे तुम्हीही काही तिच्यापेक्षा कमी नाही. माझ्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी मुळीच माफी मागणार नाही कारण मी यात चुकीचं काहीही लिहिलो नाही. जर काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा मी ही काही मोठा नाही. तुमच्याच वयातील मुलगा आहों.

 

धन्यवाद.....!

 

तुमचाच लाडका 

आशु छाया प्रमोद(रावण)