https://www.highrevenuegate.com/vp4jzjm2?key=fb5bbf53f196f803a926cdda932c8802 विचार मनातले : June 2022

Followers

Navara Baykoch Bhandan

 भांडण: एक धोक्याची घंटा

                                                जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे पती-पत्नी चं नातं आहे. कारण एकदा भाऊ आपल्याला सोडून जाईल बहीण सोडून जाईल Girlfriend/Boyfriend, Friends सर्व सोडून जातील एवढंच नाही तर आई वडील सुद्धा आयुष्यभर साथ देत नाहीत पण पती आणि पत्नी कधीच एकमेकांना साथ सोडत नाहीत. एक वेळ तर अशी येईल की, आपल्या पोटचा पोरगा सुध्दा आपल्याला सोडून जाईल पण पती पत्नी कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत. पती-पत्नी हे दोघे जणू आयुष्य नावाच्या गाडीचे दोन चाक आहेत. त्यामधील एक चाक जरी थोडा ही का होईल डगमगला तर आयुष्य नावाच्या गाडीची वाट चुकेल आणि आयुष्य संपेल. आणि या मागचं एकमेव कारण म्हणजे भांडण आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की, नात्यामध्ये भांडण होणं गरजेचं आहे. ज्या नात्यात भांडण होत नाहीत त्या नात्यामध्ये प्रेम नाही. परंतु हा च तुम्हा सर्वांचा गोड गैरसमज आहे. नात्यामध्ये छोटंसं जरी भांडण होत असेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.
                                    आज मी तुम्हाला एका मध्यमवर्गीय परिवाराची छोटीसी Story सांगतोय. पती चं नाव रवी आणि पत्नी चं नाव अंजली होतं. रवी हा Goverment Office मध्ये Job ला होता आणि अंजली Housewife होती. दोघांचं ही लग्न होऊन आज जवळपास 20 वर्षे झाली होती त्यांना एक 17 ते 18 वर्षाचा मुलगा(राहुल) सुद्धा होता. आता तुम्हाला वाटत असेल की, है तिघेही गुण्या-गोविंदाने राहत असणार. तर तुम्ही चुकीचे आहात हे तिघेही कधीच गुण्या-गोविंदाने राहिले नाही कारण रवी आणि अंजली मध्ये क्षुल्लक कारणांवरून छोटं मोठं भांडण नेहमीच होत राहायचं. कधी रवी ला Office मध्ये उशीर व्हायचा तर अंजली त्याच्यावर ओरडायची तर कधी रवी Office मधून लवकर आला आणि अंजली त्याला घरात दिसली नाही तर रवी अंजलीवर ओरडायचा. कधी Market मधून वांगे आणले आणि आलू नाही आणले म्हणून भांडण व्हायचं तर कधी Market मधुन Fish आणलं Chicken नाही आणलं म्हणुन भांडण व्हायचं. कधी रवी अंजलीच्या Relative's मध्ये जात नाही म्हणून भांडण व्हायचं तर कधी अंजली रवीच्या Relative's चा मान ठेवत नाही म्हणून भांडण व्हायचं. रवी आणि अंजली ने ही सततची भांडणं होण्यामागची कारणं जाणून घेण्यासाठी मोठ्यांशी सल्लामसलत केलं परंतु त्यांनीही हेच सांगितलं की, “पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं होणं स्वाभाविक आहे. याबद्दल तुम्ही फार विचार करू नका हे तुमच्या दोघांमधलं प्रेम च आहे.” असं त्यांनी सांगितलं म्हणून दोघेही निवांत झाले परंतू त्यांच्या याच छोट्या मोठ्या भांडणाचा प्रभाव मात्र हळू हळू त्यांचा मुलगा राहुल वर व्हायला लागला याचा त्यांना जराही भान न्हवता. एक दिवस ये सर्व त्याच्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आणि त्याने स्वतःच्याच Room मध्ये Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Sucide Note मध्ये लिहून ठेवलं, “आई-बाबांच्या सततच्या भांडणाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहो.” 
                           मुलाचा Sucide Note वाचून दोघांचेही डोळे तर खुलले होते मात्र परिस्थिती अजूनही सुधारलेली न्हवती. त्या दोघांमधले होणारे सतत ची भांडणे आता वाढू लागली. परंतु मुलगा गेल्यामुळे दोघांनाही आया त्यांच्या एकटेपणा त्यांना छळू लागला होता. रवी office मध्ये काम करत असल्यामुळे का होईना त्याला फारसा फरक जाणवत न्हवता परंतु अजली मात्र घरात एकटी पडल्यामुळे तिला तिचा एकटेपणा अती छळू लागलेला होता. तिला घरात नेहमीच तिच्या मुलाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या, तिच्या डोळ्यासमोर सारखा राहुल चा फाशी लागलेला चेहरादिसत होता. आणि तिनेही ऐक दिवस ज्या Fan ला राहुलने फाशी लावून आत्महत्या केली होती त्याच Fan ला अंजली ने देखील स्वतःला फाशी लावून आत्महत्या केली होती. आणि Suside Note वर तिने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल च्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.” आता मात्र रवी चा Office मध्ये देखील मन लागायचा नाही. त्याच्या डोळ्यासमोर सारखं अंजली आणि राहुल चा फाशी लागलेला चेहरा दिसत होता आणि कानावर दोघांच्याही किंचाळ्या ऐकायला यायच्या. त्याला घरात सुद्धा जावसं वाटत न्हवतं म्हणून त्यानेही एक दिवस Office मधल्याच एका Fan ला फाशी लावून आत्महत्या केली. आणि Suside मध्ये त्याने लिहून ठेवलं होतं की, “मी माझा मुलगा राहुल आणि माझी पत्नी अंजली या दोघांच्याही आत्महत्येला कारणीभूत आहे म्हणून मी आत्महत्या करतोय. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही दोषी ठरवू नये.” एका छोट्याशा भांडणामुळे घरातील तिघांनीही आत्महत्या केली आणि त्यांचं अख्खं आयुष्य संपलं.
                             रवी आणि अंजली यांची story वाचून तर तुम्हाला कळलंच असेल की एक छोटंसं ही भांडण कसं अख्ख्या परिवाराच्या आयुष्याची राख-रांगोळी करू शकते. आपला हा खूप गोड गैरसमज आहे की पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही त्यांच्यामधील असणाऱ्या प्रेमामुळे होतात. वास्तविकरीत्या पती-पत्नी मध्ये छोटी मोठी भांडणं ही एकमेकांना समजून न घेतल्या मुळे होत असतात. कारण लग्न जुळवतांनी आपण सर्व बघतो मात्र कधीच हे बघत नाही की मुलगा मुलगी एकमेकांना समजून घेऊ शकतात की नाही. मी माझ्या मागील blog (A social gamble एक समाजमान्य जुगार: लग्न) यामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलो की लग्न ठरवतांना मुलगा आणि मुलगी यांना हवा तेवढा वेळ द्या जेणे करून हे एकमेकांना समजू शकतील. कारण जर मुलगा मुलगी एकमेकांना समजू शकले नाहीत तर त्यांच्या मध्ये देखील रवी आणि अंजली सारखे भांडणं होतील आणि अख्ख्या परिवाराचं आयुष्य बरबाद होईल.

Conclusion:- 

                       पती-पत्नी च्या नात्यामध्ये भांडणं होत असतील तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे...कारण एक छोटंसं ही भांडण देखील विशाल रूप घेऊन अख्खं आयुष्य बरबाद करू शकते.

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

A social gamble एक समाजमान्य जुगार

जुगार




Jugar

                        तुम्हाला मला आणि आपल्यातल्या प्रत्येकच तरुणांना लहानपणा पासून आपले पालक एक गोष्ट सांगत असतात. ती अशी की बेटा, आयुष्यात कधीच जुगार खेळू नकोस. त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे. माझा त्यांच्या या गोष्टीला मुळीच विरोध नाही. आयुष्यात कधीच खेळ म्हणून अथवा Just एक Timepass म्हणून देखील जुगार खेळू नये. कारण, Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती सुद्धा परत जुगार नक्की खेळेल यात काडी मात्र शंका नाही. एकदा फक्त Timepaas म्हणून खेळणारा व्यक्ती जर का हरला तर तो जिंकण्याच्या उमेदीने परत नक्कीच खेळणार आणि जर का तो जिंकला तर आणखी जिंकण्याच्या लालच मुळे तो परत नक्कीच खेळेल आणि हाच त्याच्या Timepaas एक दिवस त्याची सवय होऊन जाईल. आणि सवय ही वाईट गोष्टींची असो वा चांगल्या गोष्टींची ती कायम वाईट च असते. हे सगळं तर तुम्हाला तुमच्या पालकांनी सांगितलं च असेल वा तुम्ही कुठंतरी नक्कीच वाचलं असेल. यात काही नवीन नाही आहे पण आता मी जे सांगणार आहे ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. जे आई वडील किव्वा जे पालक आपल्याला लहानपणा पासून सांगत आलीत की, बेटा जुगार खेळू नकोस. तेच आई वडील स्वतःच, स्वखुशीने आपल्याला जुगार खेळायला बसवतात जुगार खेळायला लावतात. आता तुम्ही विचार कराल की, “हे कसं काय शक्य आहे? माझ्या तर आई वडिलांनी कधीच मला जुगार खेळायला लावलं नाही....” तर हेच मी या Blog Post मध्ये सांगायला आलोय.
                       मुलगी 21 वर्षाची झाली आणि मुलाला नोकरी मिळाली किव्वा तो थोडाफार कमवायला लागला की त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट आपोआप Add होऊन जाते ती म्हणजे लग्न....! मुलगा नोकरी ला किव्वा काही थोडे फार पैसे कमवायला लागेपर्यंत त्यांचे आई वडील थकायला लागतात त्यांच्यासाठी घरी हाथभार लावायला कुणीतरी सोबत हवी म्हणून मुलगा कमवायला लागल्यावर लग्न करणे साहजिकच आहे यात काही शंका नाही. तसेच मुलगी ही कधीच आपल्या आई वडिलांना बोझ राहत नाही परंतु तिला वयात आल्या नंतर घरात एकटं ठेवणं बरं दिसत नाही म्हणून तिचाही लग्न करणे साहजिकच आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता हे लग्न नाही तर एक समाजमान्य जुगार च आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. लग्न हा एक समाजमान्य जुगार आहे.....! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पवित्र अशा लग्नाला जुगाराचं नाव का देतोय? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही मी देतोय.....

एक समाजमान्य जुगार: लग्न

Marriage
                                जुगार खेळणाऱ्याला नशीबाने साथ दिली तर रस्त्यावर राहणारा देखील मोठा बंगला बनवू शकतो आणि जर का जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला नशीबाने साथ दिली नाही तर एका बंगल्यात राहणारा देखील रस्त्यावर येतो. अगदी तसच लग्नाचं ही झालं आहे. Partner योग्य मिळाला तर एका झोपडी मध्ये देखील स्वर्ग असल्यासारखं वाटेल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्या मध्ये सुद्धा नरक यातना सहन कराव्या लागतील. पण हे तर नशीबावर अवलंबून आहे यात आपण माणसे काय करू शकतो? यात आई वडिलांची कुठं चुकी आहे? असं तुम्हाला वाटत असेल. तर होय तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हे नशीबावर अवलंबून आहे. पण जर का आपण लग्न ठरविण्याच्या पद्धतीवर अगदी बारकाईने लक्ष दिलं तर कळेल की मी लग्नाला जुगार का म्हटलोय...
                            अख्खं आयुष्य जातं एका माणसाला ओळखण्यात आणि हे 1 तासाच्या Meeting मध्ये ठरवतात की लग्नासाठी मुलगा/मुलगी योग्य आहे की नाही. कित्येकदा तर मुलीला विचारलं देखील जात नाही की तिला तो मुलगा आवडतो की नाही. अरे आयुष्यभर त्या मुलीला राहायचं आहे ना त्या मुलासोबत मग एकदा तिला विचारा ना.....माझ्याच वर्गातील एका मुलीचा लग्न तिच्या वडिलांनी तिच्याच आत्याच्या मुला सोबत ठरवलं...का तर म्हणे मुलगा चांगला नौकरी वर आहे. अरे लग्न त्या मुलासोबत लावायचं आहे की त्याच्या नौकरी सोबत...त्या मुलीच्या डोळ्यात च दिसते की तिला तो मुलगा मुळीच आवडत नाही हे तिच्या वडिलांना दिसत नसेल का? दिसत ही असेल कदाचित पण प्रत्येक आई वडिलांना जसा विश्वास आहे की ते त्यांच्या मुलांचं/मुलींचं वाईट होऊ देणार नाही अगदी तसाच तिच्याही वडिलांना विश्वास आहे पण हा विश्वास जरा अती होत चाललाय...आणि ते म्हणतात ना “अती तिथं माती” तसाच हा अती विश्वास देखील मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलगा चांगला दिसला की मुलीचं लग्न ठरवून टाकतात आणि मुलगी चांगली दिसली की मुलाचं ही लग्न ठरवून टाकतात त्या 1 तासाच्या Meeting मध्ये आणि मग नंतर 1 महिन्यात साखरपुडा आणि दोन महिन्यात लग्न करतात....मग त्यांच्या मध्ये पटलं नाही किव्वा काही वर्षाने तलाक झालं तर नशीबाला दोष देऊन मोकळे होतात. मला आता सांगा यात नशीबाचा काय दोष? आपण एक साधा Shirt देखील घेण्यासाठी जेव्हा shop मध्ये जातो तेव्हा कित्ती वेळ विचार करतो... Shirt हा Jeans वर शोभेल का? त्यांचा रंग आपल्यावर शूट होईल का? shirt ची Quality कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो Shirt आपल्या Budget मध्ये बसेल का? एवढा विचार करतो तो फक्त एक Shirt घेण्यासाठी मग हा तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे विचार करायला नको.. 1 तासाच्या Meeting मध्ये Partner दिसायला चांगलं वाटलं किव्वा चांगली नोकरी आहे तर लग्न लावून द्यायचं. मग हा जुगार नाही तर काय आहे? Partner योग्य मिळाला तर एका झोपडीचं देखील स्वर्ग होईल आणि जर का Patrner योग्य मिळाला नाही तर मोठ्या बंगल्याचं देखील नर्क व्हायला उशीर लागणार नाही...

Conclusion:-

                       माझा लग्नाला मुळीच विरोध नाही. मला हे देखील मान्य आहे की, आई वडील कधीच मुलांचं वाईट सोचनार नाही पण तो आधी सारखा जमाना आता राहिलेला नाही. इथे लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. लग्न हा त्या मुला-मुलीचा आयुष्यभऱ्याचा प्रश्न असतो त्यासाठी ती 1 तासाची Meeting पुरेशी नाही आहे. त्या मुला-मुलीला हवा तेवढा वेळ घेऊ द्या, त्यांना एकमेकांना समजून घेऊ द्या आणि नंतर च लग्न ठरवा. कारण हल्ली कित्येक लग्न तुटून राहिलेत त्याचा सर्वात महत्वाचा कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे हाच आहे.

Important Note:-

                             मी इथे Arrange Marriage बद्दल Problem Share केलो याचा अर्थ असं नाही की माझा Love Marriage ला पूर्ण समर्थन असेल. मुलं-मुली लग्नाच्या वयात आले म्हणजे असं नाही की ते त्यांचा Life Partner स्वतः निवडू शकतात. तुम्हाला Love Marriage करायचं असेल तर करा पण आई वडील किव्वा मोठ्यांच्या सल्ला घेऊन च समोरचं योग्य तो Decision घ्या..शेवटी लग्न हा आयुष्यभऱ्याचा प्रश्न आहे......

तुमचाच लाडका
आशु छाया प्रमोद

Alcoholic Addiction

 कोवळ्या वयात दारूचं व्यसन : ही धोक्याची घंटा

                        मी काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राच्या घरी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. काही करणास्तव तो मला घरी मिळाला नाही परंतु त्याची आई मिळाली. मी त्याच्या आई सोबत बोलायला गेलो तर त्याची आई मला रडतांना दिसली. म्हणून मी त्यांना रडण्याचं कारण विचारलं तर त्या काकूंनी मला सांगितलं की, बेटा माझा मुलगा (माझा मित्र) हल्ली खूप दारू प्यायला लागला आहे. मी काकूंना समजावलो आणि त्या शांत झाल्या. मग काकूंनी मला त्याच्या रूम मध्ये बस म्हटलं म्हणून मी मित्राची वाट बघत बसलो. मला कधीच वाटलं नव्हतं की, हा माझा मित्र एवढ्या लवकर दारू च्या विळख्यात पडेल. तसा तर तो कॉलेज इव्हेंट मध्ये मित्रांसोबत कधी कधी बियर प्यायचा. तर कधी मित्रांच्या वाढदिवसामध्ये घ्यायचा पण दारू चं व्यसन त्याला एवढं लवकर लागेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. असा विचार करत होतो तेवढ्यात माझा मित्र आला. आम्ही थोडा वेळ बोललो, त्याला थोडं समजावलो परंतु मला वाटलं नाही की त्याच्या डोक्यात काही गेलं असेल कारण ते म्हणतात ना ज्या व्यक्तीला एकदा दारू चं व्यसन लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. अगदी तसच मलाही वाटलं म्हणून मी माझ्या मित्राची रजा घेत घरी परत यायला तिथून निघून गेलो.
                     मी घरी तर पोहोचलो परंतु मला घरी याच प्रश्नाचं उत्तर मिळत न्हवतं की, एवढ्याशा लहान वयात तो दारू च्या विळख्यात अडकला कसा? कारण त्याची वय देखील फारशी न्हवतीच...! तो माझा मित्र फक्त इयत्ता ९ वी चा विद्यार्थी होता आणि तो माझ्याच कॉलेज मध्ये शिकत होता. एकदा कॉलेज मध्ये आम्ही भेटलो एक-मेकांचे विचार पटले आणि लगेच मैत्री झाली. खरं सांगायचं झालं तर त्याच्या या परिस्थिती चा कारण मी देखील आहों. तो माझा मित्र दारू शी नफरत करणारा पण मित्रांच्या आग्रहास्तव बियर प्यायला लागलाय याची थोडी फार कल्पना मला होती. मी त्याचं वेळी त्याला या पासून थोडा दूर केलो असतो तर आज कदाचित तो दारू च्या विळख्यात अडकला नसता याचंच मला फार दुःख झालं. मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे मला त्याची फार चिंता वाटू लागली म्हणून मी इतर मित्रांशी, माझ्या काही शिक्षकांशी चर्चा करून तसेच इंटरनेट च्या माध्यमांतून याबद्दल माहिती गोळा केलो. मिळालेल्या माहिती मधून मला काही आश्चर्यजनक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या...!
alcohol-consumption-increasing-in-teenagers

               आपल्याकडे मतदान करण्यासाठी 18 वर्षे वय ठरवली आहे, लग्न करण्यासाठी 21 वर्षे वय ठरवलेली आहे मात्र मद्यपान करण्यासाठी 21 वर्षे वय असावी की 25 वर्षे वय असावी याबद्दल आजही वादविवाद सुरूच आहे. यामध्ये काही लोकं असे म्हणतात की, जर मतदानाचा हक्क 18 वर्षे आहे तर मद्यपान करण्यासाठी देखील वय 18 असावी तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की, जर लग्न करण्याची वय 21 असेल तर मद्यपान करण्याची वय देखील 21 करावी. पण मला असं वाटते की, आता ही वय 12 वर्षे असावी. कारण 12 वर्षाखालील तरुण देखील हल्ली पार्ट्या, Birthday, लग्न तसेच इतर ही कार्यक्रम मध्ये सर्रास दारू पितांना आढळतात. आणि ही बाब भावी पिढी साथ फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण मानसोपचारतज्ञांच्या मते अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. पण आता मला प्रश्न पडतो की, या तरुण वयातील मुलांना दारू चं व्यसन कसं जळलं असावं?
Beer

          “बियर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतेस” असं सांगून मित्र आग्रह करतात आणि मग तो पण बियर घ्यायला सुरवात करतो. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. असच काहीसं माझ्या मित्रासोबत देखील झालं होतं. कित्येकदा तर स्वतः पालक देखील आपल्या मुलांना बियर प्यायला प्रोत्साहन करतात. कारण बियर मुळे ताण कमी होतो, झोप चांगली लागते, असे काही गैरसमज पसरलेले आहेत. बरं फक्त मुलं च दारू पितात असं देखील नाही तर यात मुलींचा प्रमाण खूप आहे. काही पालक देखील स्वतः आपल्या मुलींना दारू प्यायला परवानगी देतात. माझी खूप जवळची मैत्रीण आहे गौरी. मी तिला एकदा सहज गंमत म्हणून बियर प्यायला चल म्हटलो तर तिने मला म्हटलं, “आशु तू मला गंमत म्हणून जर का हे विचारत असशील तर वेगळी गोष्ट आहे परंतु तू खरचं म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला तयार आहे. कारण माझ्या घरी अशीही बियर प्यायची परवानगी आहे. परंतु मी आज पर्यंत कधीच पिली नाही. जर तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत बियर प्यायला येते.” यावर मी तिला म्हटलो, “बाळा गौरी मी नेहमी म्हणत असेन की आई वडिलांचं ऐकावं परंतु अशा चुकीच्या सवयी त्यांनी म्हटलं तरी देखील लावायचं नाही. मी ही दारू पित नाही आणि तुला ही दारू पिऊ देणार नाही.” माझी एक दुसरी मैत्रीण होती जिचं नाव मी सांगत नाही पण तिलाही सहज एकदा गंमत केलो चल दारू प्यायला म्हणून तर तिने ही मला म्हटलं की, मी दारू तर पित नाही पण बियर पिते. जेव्हा मी तिला बियर प्यायचा कारण विचारलो तर ती मला म्हणाली होती की, बियर ने आपली त्वचा मऊ होते. यात किती सत्यता आहे हे मला माहिती नाही. कारण, इंटरनेट वर याबद्दल मी देखील वाचलोय परंतु हे जरी सत्य असेल तरी देखील त्वचा मऊ करायला हे एकमात्र उपाय तर नाही ना.... Alovera चा गर काढून त्याचा रस बनवून त्यात हळदी आणि चवीनुसार थोडा मीठ टाकून फक्त 1 आठवडा ब्रश करायच्या आत पिलं तर तुमची त्वचा फक्त मऊ च होणार नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग, मुरूम सुद्धा गायब होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर Glow येईल. असे कित्येक उपाय आहेत. पण अशा भाकड कथा दंतकथेमध्ये सर्रास वाचायला मिळतात. आणि ह्याच दंतकथा कदाचित कारणीभूत ठरत असतात बियर चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भावी पिढी साठी धोकादायक ठरू शकते.
Drinks

                            या किशोरवयीन मुलांचं दारू कडे Attraction का वाढत चाललं यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी काही मुलांशी संवाद साधला त्यावरून त्यांच्या असं निदर्शनास आलं की, लग्नसमारंभ, वाढदिवस वा इतरही घरगुती पार्ट्यांमध्ये आपल्या आई वडील किव्वा इतर नातेवाईक दारू पिऊन नाचतात, मज्जा करतात, है बघून किशोरवयीन मुलं Attract होतात. आणि मुलांना मिळालेलं शैक्षणिक अपयश, घरगुती तणाव किव्वा हल्ली दारू पिण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रेमभंग या सर्वांचा ताण कमी करण्यासाठी हल्लीची किशोरवयीन मुलं दारू कडे आकर्षित होतात. तसेच दारूची उपलब्धता हे देखील हल्लीच्या मुलांचं दारू पिण्याचं कारण आहे. आपल्या महाराष्ट्रात 2000 मध्ये दारूचे फक्त नऊ कारखाने होते तर आज त्यांची संख्या 70 ते 80 च्या घरात गेली आहे. किशोरवयीन मुलांची दारू पिण्याची सुरवात ज्या बियर पासून सुरू होते ती बियर 2004 ते 2005 या काळात सरासरी 2.5 लाख लिटर व्हायची तर आज तिचं 5 लाख लिटर म्हणजेच दुप्पट व्हायला लागली आहे यावरून च दारू ची उपलब्धता आपल्या लक्षात येते. National Health सव्‍‌र्हेच्या २००९ च्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटामधील मद्याचे प्रमाण हे मुलांमध्ये ११ टक्के आहे, तर मुलींमध्ये १ टक्का आहे. २० ते २४ वयोगटातील युवकांमध्ये हे प्रमाण २८.८ टक्के आणि युवतींमध्ये १.४ टक्के आहे. ही माहिती देणाऱ्या मानसशास्त्रज्ञ कीर्तीसुधा राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुली आणि युवतींमध्ये मद्यपानाचे प्रमाण वास्तवात अधिक आहे; परंतु सामाजिक दडपणामुळे मुली याबाबत खुलेपणाने बोलत नसल्याने ही आकडेवारी अर्धवट सत्य मांडत आहे.
                                                                                   अशा किशोरवयीन मुलांची वेळीच समजूत काढली नाही तर भावी पिढी व्यसनाधीन होण्यास फारसा वेळ लागणार नाही. पण हल्लीचे आई वडील मुलांची समजूत न काढता जर बियर दारू अथवा सिगरेट पितांनी आढळल्यास त्यांच्यावर रागावतात. मुलगा सिगरेट दारू किव्वा कुठलाही अमली पदार्थाचा सेवण करतांना आढळल्यास त्यांना रागवण्यापेक्षा त्यांचे तोटे त्यांच्या लक्षात आणून द्या मुलांशी मोकळा संवाद साधा. मुलांशी जर तुम्ही मोकळा संवाद साधला तर मुलांना बाहेर मित्रांची फारशी गरज भासणार नाही आणि वाईट मित्रांच्या संगतीने मिळालेले वाईट सल्ले त्यांना मिळणार नाही. आणि ते दारू च्या आहारी जाणार नाहीत. 

टिपः प्रस्तुत लेख मध्ये मी काही चुकीचं लिहिलं असल्यास मला मोठ्या मनाने माफ करा. प्रस्तुत लेख Loksatta News चा आधार घेऊन लिहिलेला आहे.

संपूर्ण लेख वाचल्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहो....काही चुकलं असेल किव्वा तुमच्या काही tips असतील तर त्या comment द्वारे मला नक्की कळवा....
धन्यवाद.....!

Mahan Guru

 प्रथम गुरू कोण? 


                      आपल्या आयुष्यात एक तरी गुरू असणे फार गरजेचं आहे. कारण एक गुरू हा नेहमी आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीची जाणीव करून देत असतो. यशाच्या शिखरावर पोहोचवायला तो योग्य वळण आपल्याला दाखवीत असतो. “गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञान विना आत्मा नाही” असं म्हणतात ते योग्यच आहे.कारण आपण गुरू विना यश कधीच प्राप्त करू शकत नाही. पण तुम्हा सर्वांना आता एक प्रश्न पडला असेल ना की, आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू कोण? आणि त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी ठेवण्याचं कारण काय? तुम्हा सर्वांना जर या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ही Blog Post शेवट पर्यंत नक्की वाचा....तुम्हाला मी या पोस्ट मध्ये याचं सविस्तर उत्तर सांगेन. 
                            मी इयत्ता पाचवी मध्ये असतांना मला माझ्या शाळेतील एका शिक्षकांनी प्रश्न विचारलं होतं की, आशु तुझ्या आयुष्यातील तुझा प्रथम गुरू कोण आहेत? तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. गुरू काय आहे? गुरू कोण आहेत? आपल्या आयुष्यात गुरू चं स्थान काय आहे? अशा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्यावेळी माझ्याकडे न्हवते. पण माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की, माझे प्रथम गुरू हे माझे आई वडील आहेत. आणि माझेच नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीचे प्रथम गुरू हे त्यांचे आई वडील च असतात. मी लगेच त्या शिक्षकांना प्रश्न विचारलो की, सर आई वडील च आपले प्रथम गुरू का? तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं की, कारण आपल्याला त्यांनी जन्म दिलं, त्यांच्यामुळेच आपण हे सारं जग बघतोय त्यामुळे आपले प्रथम गुरू आई वडील आहेत. सरांचं है उत्तर ऐकून मी त्यावेळी तर नक्कीच समाधानी झालो होतो परंतु आज मी त्या उत्तराने परिपूर्ण समाधानी नाही आहो. कारण, मला वाटते की ते उत्तर परिपूर्ण नाही तर अर्धवट उत्तर आहे. मी त्या शिक्षकांना चुकीचं समजत नाही आहे कारण मला वाटते की, त्यांनी ही मला समजेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला असेल त्यामुळे त्यांनी कदाचित मला अर्धवट उत्तर सांगितलेलं असेल कारण त्यावेळी माझी वय लहान होती आणि त्यामुळे मला फारशी जाणीव न्हवती. पण जसं जसं माझं वय वाढलं तसं तसं मला कळायला लागलं की आपले प्रथम गुरू कोण आहेत? आणि आपण त्यांनाच गुरू च्या प्रथम स्थानी का ठेवतो? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मी अनुभवलेल्या माझ्या काही गोष्टींवरून सांगण्याचा प्रयत्न करतोय.
Aai Baba
                                    माझे वडील आणि माझी आई दोन्ही ही १० वी नापास आहेत. परंतु याची मला मुळीच लाज नाही तर मला गर्व आहे. कारण, त्यांनी जे काही मला शिकवलं आहे ना ते या जगातील कुठलीच शाळा, कुठलीच University किव्वा कुठलेच Teacher शिकवू शकले नाहीत आणि आयुष्यात कधीच शिकवू शकणार ही नाही. मला माझ्या आई वडिलांनी नाही फक्त जन्म दिलं, नाही फक्त मला हे जग दाखवलं तर या जगात जगणं त्यांनी मला शिकवलं. पडल्यानंतर स्वतः कुणाच्याही आधारा विना उभं राहायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मरायला शिकवलं. स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं कारण माझ्या आई वडिलांना वाटतं की, माझ्या मुलाने यशाचं शिखर गाठावं....मी नेहमी च ऐकत आलोय की, पैशाशिवाय जा जगात काहीही करू शकत नाही पण खिशात पैसा नसतांना देखील समाजसेवा कशी करायची ते मी माझ्या वडिलांकडून शिकलो, राजकारण कसं करायचं ते ही मी माझ्या वडिलांकडून शिकलो आणि घरातील एका पोळी मधून निम्मी पोळी खाऊन निम्मं उपाशी राहून भुकेलेल्याचं पोट कसं भरायचं ते मी माझ्या आई कडून शिकलो, पैशांची काटकसर कशी करायची ते देखील मी माझ्या आई कडून शिकलो. म्हणून च मी माझ्या आई वडिलांना कायम गुरूच्या प्रथम स्थानी ठेवतो.
                         आता तुम्हाला वाटत असेल की, हे तर मी फक्त माझ्या आई वडिलांबद्दल बोलतोय. तर याचं उत्तर “नाही” असं आहे कारण, या जगातील कुठलेही आई वडील असोत मग ते पदवीधर असोत किव्वा मग त्यांनी शाळेतील पायरी सुद्धा कधी ओलांडली नसेल तरी देखील ते आई वडील आपल्या मुलांसाठी प्रथम गुरू आहेत. कारण त्यांनी नाही फक्त मुलांना जन्म दिलं, नाही फक्त त्यांना हे जग दाखवलं तर या जगात जगायला शिकवलं, योग्य वळणावर चालायला शिकवलं, स्पर्धेत टिकून राहायला शिकवलं. मुलांच्या पंखांना बळ देऊन उंच भरारी मारायला शिकवलं कारण या जगातील प्रत्येक च आई वडिलांना वाटते की, त्यांच्या मुलांनी यशाचं शिखर गाठावं..मग ते शिक्षित असोत वा अशिक्षित असोत. आई वडील मुलांना जे शिकवतात ते या जगातील कुणीही शिकवू शकत नाही मग ते कितीही महान असले तर आई वडिलांची कमी पूर्ण करून देऊ शकत नाही. त्यांच्या सारखं शिकवू शकत नाही म्हणून मी नेहमीच म्हणतोय की, आई वडील हेच आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू आहेत.        
         

Conclusion:- 

                      मला या Blog Post मधून हेच सांगायचं होतं की, आई वडील हेच आपले प्रथम गुरू असतात. कारण, ते जे शिकवतात ते या जगातील कुठलीच University असो वा कुठलाच Teacher असो शिकवू शकत नाही. तराजू च्या एका पारड्यात जगातील सर्व गुरू ठेवा आणि एका पारड्यात फक्त आई वडिलांना ठेवा आणि बघा आई वडिलांचाच पारडा भारी असेल.....
Happy Marriage Anniversary mammi papa
             आज ही पोस्ट लिहिण्याचा कारण की, आज माझ्या गुरूंचा अर्थात माझ्या आई वडिलांची Marriage Anniversary आहे. मला ही त्यांच्या साठी काहीतरी भेट द्यायची होती पण काय देऊ त्यांना भेट हाच मला प्रश्न पडला होता कारण आज जे काही आहे माझ्याकडे ते सर्वस्व त्यांचंच आहे. आज मला एक रुपयाचं चॉकलेट घ्यायला सुद्धा मला त्यांनाच पैसे मागावे लागतात तर मी त्यांना काय भेट देऊ शकतो. मी त्यांनी काही अनमोल भेट देऊ शकत नाही पण एक मात्र नक्की की, त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
Happy Marriage Anniversary मम्मी पप्पा
तुमचाच
आशु छाया प्रमोद

टिपः छाया हे नाव माझ्या आई चे आहे आणि प्रमोद हे नाव माझ्या वडिलांचं आहे. मी नेहमी आपल्या नावासोबत आई वडिल दोघांचं नाव लिहितो कारण माझ्या नावावर दोघांचाही समान हक्क आहे म्हणून.......